Tag Archives: एकनाथ शिंदे

शिंदेच्या संजय गायकवाड यांचा हॉटेलमधील गुंडागिरीनंतर वैचारीक क्षेत्रात गुंडगिरीचा प्रयत्न ३८ वर्षानंतर शिवाजीच्या एकेरीच्या उल्लेखाची आठवण

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी, ३८ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील एका पुस्तकावरून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि शिवीगाळ केली, असा आरोप एका प्रकाशकाने गुरुवारी केला. सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. या क्लिपमध्ये संजय गायकवाड हे आक्षेपार्ह …

Read More »

पायाभूत सुविधा समिती आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बॉयोगॅस धोरण (सीबीजी), 2026 जाहीर, सात आदर्श महाविद्यालयांमधील शिक्षकांना यूजीसीच्या निर्देशानुसार मूळ वेतन, सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आयटी पार्कला जमीन, कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना हे प्रमुख निर्णय घेण्यात आले. तर पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मेट्रो-५ …

Read More »

बदलीच्या दिवशीच ‘धडाधड’ बदल्या, पोलीस अधीक्षकांकडून नियमबाह्य बदल्यांचा गंभीर आरोप सातारा शिवसेनेची पोलिस महासंचालक आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार

सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची सांगली येथे तडकाफडकी बदली होताच त्यांनी अखेरच्या दिवशीच ‘पॉवर प्ले’ करत त्यांनी आपल्या अधिकारात जिल्ह्यातील सहा ते सात पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून शिवसेना सातारा जिल्ह्याने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

पर्यटकांना वाचवताना बलिदान देणारा आदिलच्या कुटुंबाला शिवसेनेने दिले नवीन घर *‘हे घर केवळ निवारा नाही, तर वीरतेचा सन्मान’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आदिलच्या बलिदानाचा गौरव*

धर्म, भाषा आणि पंथाच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी स्वतःचा जीव अर्पण करणारा आदिल हा केवळ एक तरुण नव्हे, तर देशाच्या अस्मितेचा जाज्वल्य दीप आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. “एका आईचा मुलगा, एका कुटुंबाचा आधार क्षणात हिरावला गेला… पण मानवतेसाठी दिलेलं हे बलिदान देश कधीच विसरणार नाही, ते इतिहासात …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने माढा आणि सोलापूर मधील सर्व कार्यकारण्या बरखास्त नव्याने सर्व कार्यकारणीची स्थापना करणार

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील माढा व सोलापूर या दोन लोकसभा क्षेत्र मतदारसंघातील जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख पदापर्यंतच्या शिवसेना पक्षाच्या तसेच युवा सेना, महिला सेना, अंगीकृत संघटनांच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे असे सोबतच्या लेखी प्रसिद्धी पत्राद्वारे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी जाहीर …

Read More »

राज्यपाल वर्मा यांची स्पष्टोक्ती, घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतले निर्णय

राज्य सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कुळगांव-बदलापूर मधील मंजूर विकास आराखड्यातील चार एकर जमीन वीज उपकेंद्र उभारणीसाठी देणार, नाबार्डकडून मच्छिमारांच्या मुलभूत सोयी सुविधांकरिता ६१ कोटी २४ लाख, मुंबईत आयईएस स्कील टेक विद्यापीठ होणार, वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग, आरोग्य सेवा सशक्तीकरणासाठी जायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची सहाय्यता, आकांक्षित …

Read More »

आशा भोसले यांचा स्वर कायमचा शांत, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शोक उद्या होणार अंत्यसंस्कार

ख्यातनाम आयकॉनिक पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली जो भी है बस यही एक पल है’ हे गीत त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान होते’ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प

मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या माध्यमातून नागरिकांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) चा पहिला टप्पा देशभक्त …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास होणार जलद

दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह आजपासून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर हा प्रवास जलद होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »