कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्जनशील क्षेत्रासाठी अमर्याद संधी उपलब्ध करून देत असली तरी तिचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि विवेकाने केला गेला पाहिजे, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही परिवर्तन घडवून आणणारी शक्ती आहे. मात्र तिचा वापर करताना चित्रपट निर्माते आणि सर्जकांच्या बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे …
Read More »राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यास विद्यापीठांनी जगासाठी योग प्रशिक्षक घडविण्याचे, राज्यपालांचे आवाहन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योगसत्रात सहभाग घेतला. यावर्षी लोकभवनातील योग दिवस भारतीय तटरक्षक दलाच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. भारतीय तटरक्षक दल यंदा स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. योगसत्राला तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसेच महाराष्ट्र लोकभवनातील अधिकारी …
Read More »राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष भक्तिपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
“सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक आहे. हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आजही दिमाखात उभे आहे, हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. गुजरात येथील सोमनाथ मंदिरांच्या पुनर्बांधणीस ७५ वर्षे पूर्ण झाली असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, कायदा सुव्यवस्थेप्रश्नी राज्यपालांनी लक्ष घालावे; ‘शक्ती’ कायदा लागू करा मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांची राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे पत्र पाठवून मागणी
राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना भिती बसली पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे. नसरापूरच्या घटनेनंतर आतातरी राज्य सरकारने गंभीर होऊन महिला सुरक्षेवर काम करावे, यासाठी राज्यपाल यांनी जातीने लक्ष घालावे व ‘शक्ती’ कायदा लवकरात लवकर राज्यात लागू करावा यासाठी …
Read More »राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा विश्वास, ‘विकसित महाराष्ट्र-2047 कडे वेगवान वाटचाल १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प
स्वातंत्र्याच्या अमृत काळानंतर आता देश विकसित भारत २०४७ कडे वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ५ ट्रिलियन डॉलर्सच्या संकल्पनेत महाराष्ट्राचा ‘१ ट्रिलियन डॉलर्स’ अर्थव्यवस्थेचा वाटा असेल. राज्य शासनाने तयार केलेले ‘विकसित महाराष्ट्र २०४७ हे व्हिजन डॉक्युमेंट राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवेल, असा विश्वास …
Read More »मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन
राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई अग्निशमन दल, एमआयडीसी व महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील १२ अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवेकरिता जाहीर झालेले राष्ट्रपती पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. गेल्या काही दशकांत अग्निशमन …
Read More »राज्यपाल वर्मा यांची स्पष्टोक्ती, घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या …
Read More »ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध मान्यवर आणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन
ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दादर येथील कै.भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. दिवंगत आशा भोसले यांच्या अंत्यसंस्कार …
Read More »आशा भोसले यांचा स्वर कायमचा शांत, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शोक उद्या होणार अंत्यसंस्कार
ख्यातनाम आयकॉनिक पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली जो भी है बस यही एक पल है’ हे गीत त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान होते’ …
Read More »महाराष्ट्र लोक भवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा बिहार ही संसदीय परंपरांची जन्मभूमी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे ‘बिहार राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र लोकभवनातर्फे बिहार राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. बिहार ही संस्कृती, अध्यात्म व तत्वज्ञानाची भूमी आहे. या भूमीने देशाला भगवान महावीर …
Read More »
Marathi e-Batmya