माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (२५ डिसेंबर) केन-बेतवा रिव्हर लिंकिंग राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे पन्ना व्याघ्र प्रकल्पाला धोका असल्याचे सांगत काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली. केबीएलबी KBLP ने केन नदीचे पाणी यमुनेच्या दोन्ही उपनद्या बेतवा नदीत सोडण्यात येणार असल्याची कल्पना केली …
Read More »निवडणूक नियमात बदल काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव नागरिकांचे अधिकार कमी करण्यासाठीच हा बदल केल्याचा काँग्रेसचा आरोप
काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारने निवडणूक घेण्याविषयीचा नियम, १९६१ मधील नुकत्याच केलेल्या सुधारणांना आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्याद्वारे निवडणूक संबंधित नोंदींमध्ये प्रवेश करण्याचे नागरिकांचे अधिकार कमी केले गेले आहेत असा आरोपही यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारवर केला. याचिकेनुसार, निवडणूक आयोग, जी एक संवैधानिक संस्था आहे, ज्यावर मुक्त आणि निष्पक्ष …
Read More »नो बॅनर साठी आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध
२०२५ मध्ये पदार्पण करताना तसेच, लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून; नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आदित्य ठाकरे पुढे लिहिलेल्या …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा प्रदेश काँग्रेसकडून राज्यभर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा’चे आयोजन
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …
Read More »शिवराज सिंह चौहान यांची घोषणा, प्रत्येक गरीब शेतकऱ्याला ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्याकरिता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे महत्त्वाचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस योजनेतंर्गत देशातील तसेच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था अर्थात अटारी, शिवाजीनगर येथे …
Read More »छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, अजित पवार म्हणाले पक्षातंर्गत मामला छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष्य
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश न करण्यात आल्याने भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर जाहिर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी निर्णय घेणार असल्याचे सांगत ओबीसी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत पुढील निर्णयाच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी …
Read More »७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे? लेखक- राम पुनियानी यांचा खास लेख
भारतीय संसदेने दोन दिवस भारतीय संविधानावर चर्चा केली. विरोधी पक्षनेत्यांनी असा युक्तिवाद केला की आपल्या संविधानात समाजातील दुर्बल घटक, धार्मिक अल्पसंख्याक आणि इतरांच्या अधिकारांच्या वाढीसाठी मोठी जागा आहे, त्यांना भयंकर त्रास होत आहे. मुस्लिमांना द्वितीय श्रेणीचे नागरिकत्व देण्यात आले आहे. सत्ताधारी, संसदेतील भाजप नेते आणि संसदेबाहेरील त्यांच्या विचारवंतांनी असा युक्तिवाद …
Read More »खाते वाटपानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात वाळू माफियांना पायबंद घालू महसूल विभाग 'जनता सर्वोपरी' ठरवू, झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न मार्गी लावणार
जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण आणू” अशी घोषणा राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करत पुढे म्हणाले की, ” जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल असे सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे, त्यासंदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळूविषयक सुलभ धोरण …
Read More »अमित शाह व भाजपा विरुद्ध मुंबईत बहुजन समाजाचा निषेध मोर्चा गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागून त्वरित राजीनामा द्यावा .. नसीम खान
उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील साकीनाका येथील पेनुनसुला हॉटेल पासून …
Read More »महायुती सरकारकडून जमिन वाटपात अदानीचा नंबर झाल्यानंतर आता अंबानीचा… महासेजसाठीच्या जमिनी रहिवाशी वापरासाठी करण्याच्या हालचाली, तर पालघरमध्ये १२५६ एकर जमिन
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या नंतर बहुचर्चित आणि प्रलंबित असलेल्या धारावी पुर्नविकासाचा प्रकल्प निविदा प्रक्रियेत अदानी कंपनीला देण्याच्या खटपटी केल्यानंतर अदानीसाठी मुंबईतील शेकडो हेक्टर मोकळ्या असलेल्या सरकारी जमिनी धारावी पुर्नविकासाच्या नावाखाली अदानीला देऊ टाकल्या. त्यानंतर आता मुकेश अंबानीचा नंबर राज्य सरकारकडून लावला असून मुकेश अंबानी यांच्या कंपनीलाही शेकडो हेक्टर जमिन …
Read More »
Marathi e-Batmya