Breaking News

Tag Archives: भाजपा

नाना पटोले यांचा आरोप, … कॅबिनेटमध्ये जाहीर केलेली मदत अत्यल्प

राज्यात दुष्काळाची भयंकर स्थिती निर्माण झालेली असताना भाजपा सरकार त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना केवळ घोषणाबाजी केली जात आहे. हे सरकार जाहिरातबाजीवर उधळपट्टी करते आणि शेतकऱ्यांना पैसे देताना हात आखडता घेते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कॅबिनेटमध्ये जाहीर केलेली मदत अत्यल्प असून भरीव मदत जाहीर केली पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळवून …

Read More »

अजित पवार यांचा शरद पवारांवर आरोप, फसवणूक असे म्हणणार नाही, पण…

२०१४ पर्यंत आपल्याला भाजपासोबत जायचं आहे. हे यांच्या गावीही नव्हतं. का तर तो पर्यंत ते सत्तेत होते. त्यानंतर मात्र त्यांना भाजपासोबत जायचं असल्याची आठवण झाली. त्यानंतर जो काही शपथविधी झाला, तसेच माघारी बोलावणं झालं. बर त्यानंतर पुन्हा भाजपासोबत जायच असल्याचं वरिष्ठांनी सांगितलं. त्या बैठकीला जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह सर्वजण …

Read More »

प्रफुल पटेल यांचा इशारा, भविष्यात पुस्तक लिहिणार…त्यात खूप काही मटेरियल मिळेल

माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार असून त्यावेळी मी माझी बाजू मांडेन आणि त्यात खूप काही मटेरियल मिळेल अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी वैचारिक मंथन शिबीरात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबीराच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या सत्रात …

Read More »

…पंतप्रधान मोदी यांनी तीन राज्यांसोबत मुंबईतल्या वार्डातील जनतेशीही साधला संवाद

विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन याला जन आंदोलनाचे रुप द्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. महिला, युवा, शेतकरी आणि गरीब हे समाजातील अमृतस्तंभ असून, यांचा विकास हाच शासनाचा ध्यास आहे. या चार वर्गाच्या विकासाद्वारे भारताचा विकास साधण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवून ‘विकसित …

Read More »

धरमतर, बाणकोट खाडीपुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्या

पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास गती देण्यात यावी. त्या अनुषंगाने धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे ‘नौकावहनासाठी गाळ्याची उंची व रुंदी’ साठीचे ना-हरकत प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला आज दिले. …

Read More »

उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची सुखरूप सुटका नितीन गडकरी यांनी मानले सर्व टीमचे आभार

देशातील उत्तराखंड राज्यातील हिमालय रांगेतील डोंगराळ भागातील सर्वात मोठ्या उत्तरकाशी (डोंगर पोखरून) बोगद्याचे काम सुरु असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळल्याने ४१ कामगार अडकले होते. जवळपास आठवडाभरानंतर या अडकलेल्या ४१ आमदारांना सुखरूप बाहेर काढण्यात विविध यंत्रणांच्या मदतीमुळे यश आल्याची माहिती केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज बुधवारी …

Read More »

राज्यातील भाजपा सरकारची ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, विकास चा पत्ता?

२०१४ साली केंद्रात भाजपाप्रणित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी देशातील पहिल्या टप्प्यात ५० शहरांची निवड स्मार्ट सिटी या योजनेंतर्गत मोदी सरकारने केली. त्यानंतकर १५० शहरांची निवड करण्यात आली. पुढे देशातील प्रत्येक राज्य सरकारांवर या स्मार्ट सिटीची निर्माण करण्याची जबाबदारी राज्य सरकारने सोपविली. ही योजना सुरु होऊन …

Read More »

कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू आहे का? सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या, म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्‍वास नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केला. …

Read More »

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनावर तीन डिसेंबरचे सावटः राज्यात मध्यावधी लागणार ?

देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम आता संपत आला आहे. पाच राज्यांपैकी मिझोरम, छत्तीसगड, राजस्थान ही तीन राज्ये पुन्हा एकदा काँग्रेस राखण्याच्या तयारीत आहेत. तर तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यात काँग्रेसचे सरकार पुन्हा एकदा स्थानापन्न होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी या पाचही राज्यांचा स्पष्ट कौल भाजपाला की, काँग्रेसला …

Read More »

केसरकरांच्या त्या व्हिडिओवर सुप्रिया सुळे यांचा सवाल, या मंत्र्यांना झालंय तरी काय?

रविवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारालाच भरती कधी होणार असा प्रश्न विचारला. त्यामुळे संतापलेल्या शिक्षण मंत्र्यांनी बेशिस्त शिक्षक आवडत नसल्याचे सांगत प्रश्नकर्त्या संभावित शिक्षक महिलेला डिसक्वालिफाय करण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे …

Read More »