काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अॅटम बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा करत लोकसभा आणि महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणूकीत मतचोरी भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केला असल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या आधी दोन व्यक्ती भेटायला आल्याचे आणि १६० जागा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही पुण्यासाठी आणखी ५ नवीन पोलीस स्टेशन देणार पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन
पोलिसांसमोराची आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेवून ६० वर्षानंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनची नवी रचना, नार्कोटीक्स, फॉरेन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे. यापुढेही पोलस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी, येवलेवाडी अशा पाच …
Read More »मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडून केंद्राच्या एनईपीला एसईपी धोरणाने प्रत्युत्तर केंद्राच्या धोरणात त्रिसुत्री भाषेचे धोरण तर राज्याच्या धोरणात द्विभाषेचे धोरण
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी शुक्रवारी कोट्टूरपुरम येथील अण्णा सेंटेनरी लायब्ररी ऑडिटोरियममध्ये राज्य शिक्षण धोरण (एसईपी) चे अनावरण केले आणि ते केंद्राच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला (एनईपी) एक स्पष्ट पर्याय म्हणून मांडले. नवीन धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी २०२२ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती मुरुगेसन यांच्या अध्यक्षतेखाली १४ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी पूर्व नियोजन महत्वाचे पायाभूत सुविधा विकास प्रकल्प कार्यशाळेचे उद्घाटन
पूर्व नियोजन, कालमर्यादा, पारदर्शकता, गुणवत्ता आणि विविध विभागांच्या समन्वयाच्या माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करून सर्व यंत्रणांनी एकत्रितरित्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे आयोजित पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षणाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या …
Read More »कर्नाटकच्या सरकारला राहुल गांधी यांचे आवाहन, महादेवपुरातील मतचोरीची चौकशी करा कर्नाटकातील निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्याकडे मागितली होते पुरावे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरोप केला की, निवडणूक आयोग (EC) इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या आणि मतदान केंद्राचे व्हिडिओ शेअर करण्यास नकार देऊन “मोठा गुन्हा लपवत आहे”. कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कथित चोरीला आळा घालण्यासाठी हे केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. बेंगळुरू येथील एका …
Read More »बेस्ट महाव्यवस्थापकांच्या मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडून नेमलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा गोंधळ आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाच्या अतिरिक्त कार्यभारावरून निर्माण झालेला गोंधळ बुधवारी दूर झाला. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपविण्याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये जारी करण्यात आले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये आयएएस अधिकारी आशिष शर्मा यांच्या नियुक्तीचा आदेश …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, दावोसनंतरच्या १५ लाख ९८ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या त्या कुठंयत ? ट्रिपल इंजिन सरकार नोकऱ्या देण्यात फेल
२०१५ पासून प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत, महाराष्ट्र प्रशिक्षण देण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण नोकरी देण्यात ११व्या क्रमांकावर आहे. १३ लाख ३१ हजार लोकांना प्रशिक्षण दिले पण त्यातील फक्त ८० हजार लोकांना नोकरी देण्यात यश आले. म्हणजे १०% बेरोजगारांनाही हे सरकार नोकरी देऊ शकले नाही हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे …
Read More »वाढवण बंदर ‘फ्रेट कॉरिडॉर’ बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाला जोडणार १०४. ८९८ किलोमीटरचा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग, अंतर, वेळ, इंधनाची बचत
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर (तवा) आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे यांना जोडण्यात येणार आहे. या १०४. ८९८ किलोमीटरच्या शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा …
Read More »महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण-२०२५ जाहीर पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडवणार, ५० हजार स्टार्टअप्सचे उद्दीष्ट
महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडतील आणि ५० हजार स्टार्टअप्स् सुरू होतील असे नियोजन आहे. यामुळे देशातील सर्वाधिक यामुळे राज्यात स्टार्टअप आणि युनिकॉर्न्स राज्यात स्थापन होण्याबरोबरच रोजगार …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, …कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवा कबुतरे वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील मनाचा पुढाकार
कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, कबूतरखान्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश …
Read More »
Marathi e-Batmya