राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी २३ ऑक्टोबरला जाहीर केल्यानंतर आज ७ उमेदवारांची दुसरी यादी प्रदेश कार्यालयात जाहीर केली. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी आज जाहिर झाली. या यादीत नवाब मलिक यांच्या उमेदवारी ऐवजी त्यांची कन्या सना मलिक-शेख यांना अनुशक्ती …
Read More »खिचडी घोटाळा प्रकरण : सुरज चव्हाण यांचे अटकेला आणि ईडी कोठडीला आव्हान उच्च न्यायालयाने बजावली प्रतिवाद्यांना नोटीस
कोरोनाकाळात मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांनी अटकेला तसेच सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) कोठडीला आव्हान दिले आहे. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवाध्यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना १७ जानेवारीला खिचडी घोटाळा प्रकरणी …
Read More »सागर बंगल्याला नाराजांची भरती पहिल्या यादीनंतर नाराज भाजपा उमेदवार-आमदारांची रिघ
विधानसभा निवडणुकीची एकहाती सूत्रे भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. त्यातच भाजपाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर राज्यातील अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहिर केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संधी मिळावी यासाठी उमेदवारी जाहिर न झालेल्या नाराज उमेदवारांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर एकच गर्दी केली. त्यामुळे सागर …
Read More »अफवांवरील चर्चेला संजय राऊत यांचे उत्तर, एक तर बाप दाखवा, नाही तर श्राद्ध घाला भाजपाचा खोटारडेपणाः महाविकास आघाडीत २१० जागांवर एकमत
सकाळपासून शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची आणि संजय राऊत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त आज सकाळपासून विविध प्रसारमाध्यमांवर सुरु होते. या वृत्तावर अखेर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते तथा नेते संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) विधानसभेच्या २८८ …
Read More »नाना पटोले यांची माहिती, ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा भाजपाकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न; काँग्रेस-शिवसेनेत कसलेही वाद नाहीत
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असे …
Read More »घराणेशाहीला विरोध करता करता भाजपाच्या पहिल्या यादीत घराणेशाहीच १० कापलेल्या उमेदवारांच्या कुटंबियांनाच तिकीटे
नवीन कुमार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्या मोठ्या बार्गेनिंगनंतर उमेदवार निवडत आहेत. महायुतीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेल्या गदारोळात भाजपाने रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या ९९ उमेदवारांमध्ये १० नवीन चेहरे आहेत. …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, पराभव दिसू लागल्याने मविआचे नेते मतदार यादीवर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांची टीका
महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रत्येक मतदारसंघातील विशेषतः ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार उभा राहणाऱ्या मतदारसंघातील महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांपैकीची १० हजार मते कमी करायची आणि त्यांची १० हजार बोगस मते त्या मतदार यादीत समाविष्ट करायची असा कट रचलेला आहे. …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची घोषणा, आपल्याला संपविणाऱ्यांना संपवायचाय… अर्ज काढून घ्या म्हणलं की काढू घ्या, राखीव मतदारसंघातील आपल्या विचाराच्या उमेदवाराला मदत
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा राज्य सरकारला विविध मार्गांनी आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र राज्य सरकारने दिलेली मागणी पूर्ण करत नसल्याचे दिसताच निवडणूकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार आज सकाळपासून अनेक राजकिय जाणकार, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची मते जाणून घेतली. त्यानंतर मराठा समाजाच्या …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, निवडणूक आयोगात फूट पाडून राजकीय लाभ घ्यायचाय फोडा आणि राज्य करा हेच भाजपा, काँग्रेसचे धोरण
फोडा आणि राज्य करा हेच भाजपा, काँग्रेसचे धोरण आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपाने सर्वोच्च न्यायालयाचा क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच …
Read More »आशिष शेलार यांचा आरोप, धारावीकरांचा उपयोग करुन मुंबईत व्होट जिहाद वर्षा गायकवाड यांना पुढे करून अडचणीत आणू नका
शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार उबाठा सेनेची लढाई ही अदानी साठी आहे. आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबई व्होटजिहाद केला जातोय, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. धारावीबाबत आज पुन्हा …
Read More »
Marathi e-Batmya