Breaking News

Tag Archives: महायुती सरकार

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, निवडणूकीचा कालावधी येईपर्यंत आपली बहिण आठवत नव्हती… हे सरकार गेल्यात जमा , वेळ पडली तर तर आंदोलनकर्त्यांबरोबर आंदोलन करतील

कोकणातील दौऱ्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज संभाजीनगरमध्ये शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. तसेच राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीसाठी भाजपा-शिंदे सरकारचे तुघलकी फर्मान कुर्ल्यातील शासकीय कर्मचा-यांना बेघर करणारी नोटीस

राज्यातील भाजपा युती सरकारला जनाची नाही आणि मनाचीही नाही. दोन गुजराती मालकांच्या आदेशाने काम करणारे युती सरकार मुंबईकरांच्या जीवावर उठले आहे. मुंबई अदानीला विकूनच शिंदे-फडणवीसांचा आत्मा शांत होईल असे दिसत आहे. कुर्लाच्या मदर डेअरी कर्मचारी वसाहतीतील कुटुंबांना पर्यायी व्यवस्था न देताच १५ दिवसात घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारचा भूखंडावर ताव, लाडक्या मंत्र्यांसाठी योजना बिल्डरमंत्री संजय राठोड लाभार्थी

महायुतीच्या मंत्र्यांनी सरकारी तिजोरी फस्त केली. त्यामुळे आता ‘भूखंडावर ताव मारा आणि तृप्त व्हा’ अशी नवी योजना महायुती सरकारने लाडक्या मंत्र्यांसाठी आणली आहे. या योजनेचे लाभार्थी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत. मंत्रिमंडळात असणाऱ्या बिल्डर मंत्र्यांनी देखील सातशे कोटींचा भूखंड जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशनच्या नावाखाली हडप केला आहे. कुलाबा महसूल …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, केंद्रासाठी महाराष्ट्र लाडका नाही का? मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुतीने केंद्राच्या पाया पडावं

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही तरी देखील राज्याचे कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाकडे हा खरा प्रश्न आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि …

Read More »

लाडकी बहिण योजना आणि शेतकऱी कुटुंबासाठी राखीव निधीबाबत सरकारचा खुलासा लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला वर्गाची मता नजरेसमोर ठेवत आणि त्यांना खुष करण्यासाठी मुख्यंमत्री लाडकी बहिण योजना राज्य सरकारने जाहिर केली. मात्र या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यावधी लाभार्थ्यांना निधी वितरीत करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच आदिवासी विभाग, समाज कल्याण विभागाचा निधी या योजनेसाठी वळविला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांसाठी राखीव असलेला निधीही या …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, हॉस्पिटलची ५०० कोटींची जमीन ७० कोटीत… मविआ सरकार असताना एस. टी. संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता गप्प का ?: विजय वडेट्टीवार

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून हत्या, खून, दरोडो, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा युती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व लक्ष मात्र घोटाळे करून पैसा वसुल करण्याकडे आहे, असा घणाघाती हल्लाबोल …

Read More »

जोडे मारो आंदोलनः शरद पवार यांचा आरोप, मालवणमध्ये उभारलेला पुतळा भ्रष्टाचाराचा… शिवप्रेमी जनतेचा अपमान केला

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात आज जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्यानिमित्ताने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप गेट वे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …

Read More »

जोडे मारो आंदोलनः नाना पटोले यांची टीका, ही भाजपाची पेशवाई वृत्ती…चुकीला माफी नाही राजकोटच्या किल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना

भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, अन्यथा श्रीलंका- बांग्लादेशसारखी स्थिती पोलिसांना सत्ताधा-यांच्या जवळच्या गुंड माफियांच्या सुरक्षेला, महिला मुलींची सुरक्षा कोण करणार?

राज्यातील महायुतीचे सरकार जनतेच्या मतदानाने नाही तर गुजरातच्या आशिर्वादाने आले आहे. या महाभ्रष्ट सरकारला मराठी माणसांपेक्षा गुजरातच्या भल्याची जास्त चिंता आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला लुटून गुजरातचे भले करणे हाच एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. राज्याची लूट थांबवून जनहिताची कामे करा अन्यथा तुमची अवस्था श्रीलंका, बांग्लादेशच्या सत्ताधा-यांप्रमाणे होईल असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, सरकार अडचणीत…वकील कोर्टात, हा काय नेक्सस आहे? महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था अधोगतीकडे

राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारच्या घटना तसेच बदलापूरमधील शाळेत चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज राज्यभरात महाविकास आघाडी आणि इतर पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्य़ातील वाळवा तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर बसून तोंडाला काळी …

Read More »