कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश… नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा
पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत. दरम्यान, राज्यातील …
Read More »मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबई आणि मुंबईकरांची उडाली दैना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्यातील मान्सूनने काढली हवा
मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर एकाच दिवसात मान्सूनचे पदार्पण महाराष्ट्रात झाले. पण मान्सूनच्या पावसाला मुंबईत पोहोचायला तीन दिवस लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. पण तत्पूर्वीच कोकणात आलेल्या पावसाने मुंबईत रात्रीत आगमन करत रात्रभर मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मान्सूनने चांगलीच हजेरी लावत कोसळायला सुरुवात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ‘उडान’ मुळे नागपूरतील मानसिक आरोग्य सेवांचे सशक्तीकरण टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उडाण अभियान
‘उडान’ या जिल्हास्तरीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाने नागपूर जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळवले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मानसिक आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्ट्सच्या सहकार्याने सुरू केलेल्या उडान उपक्रमांत मानसिक आरोग्याची जनजागृती वाढविणे, ग्रामीण व शहरी भागात सहज सेवा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, २०३० पर्यंत राज्यासाठी ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ घेऊन सज्ज-निती आयोगाची नवी दिल्लीत बैठक
विकसित भारत-२०४७ चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सोबत महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ साकार करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सज्ज असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. तसेच महाराष्ट्रात २०३० पर्यंत राज्यासाठी आवश्यक ५२ टक्के ऊर्जा ही हरित स्रोतांतून निर्माण केली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य पोलीस दलाला बळकटी देणाऱ्या इमारतीचे उद्घाटन
राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने ४० हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयामुळे विदर्भात भूमिहीन होण्याचा धोका सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले, पुनर्विचार याचिका दाखल करावी
विदर्भातील सहा जिल्ह्यातील झुडपी जंगलाला वनक्षेत्र घोषित करून ८६ हजार हेक्टर क्षेत्र महसूल विभागाने वनविभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यामुळे या जमिनीला डिनोटीफाय करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील लाखो कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका असून या भागाच्या विकासाला खिळ बसणार आहे. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु ७१३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण
शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांच्याहस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ७१३ कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा …
Read More »धुळेमध्ये सरकारी रेस्ट हाऊसमध्ये २ कोटींचे घबाड; एसआयटी चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही सत्य बाहेर आणू, अर्जुन खोतकर यांचे पीए निलंबित
धुळे जिल्ह्यातील एका सरकारी अतिथीगृहाच्या खोली क्रमांक १०२ मधून सापडलेल्या १ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम सापडली. या रकमेवरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी ही रक्कम शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर यांचेच पैसे असल्याचा आरोप केला. सदर रेस्ट हाऊसची ती खोली अर्जून खोतकर यांच्या …
Read More »मुंबईसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळा रोडचा समावेश
अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya