Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोणाचाही समावेश नाही

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार म्हणाले, पुढच्या आठवड्यात विचारेन आमचे चांगले संबध असले तरी मला विचारण्याचा अधिकार नाही

काल सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्तावर उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली. तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून अद्याप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा …

Read More »

ईडीकडून रोहित पवार यांच्या विरोधात एमएससीबी प्रकरणी गुन्हा आर्थिक घोटाळे करून तोट्यातील कारखाने खरेदी केल्याचा आरोप

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात एमएससीबी कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचनालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी ईडीने बारामती अॅग्रो लि. च्या कन्नड एसएसके साखर कारखाना खरेदी प्रकरणी ५० कोटी रूपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. त्याचबरोबर रोहित पवार यांना …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, शासनाने शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये अशी विधानसभेत केली मागणी

नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये व  शासनाने त्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली. यावेळी सभागृहात बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी, चंदवाडी येथील शेतकर्‍यांनी ६.५ किलोमीटर अंतरावरून वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी २.५ कोटी …

Read More »

गिरीश महाजन यांचे आंदोलनकर्त्या शिक्षकांना आश्वासन, वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात २०% वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा केले जाईल

पाच जुलै पासून आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना आज अखेर काही प्रमाणात दिलासा राज्य सरकारने दिला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी आज आझाद मैदानावर जात शिक्षकांच्या बँक खात्यावर वाढीव वेतन पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. शिक्षकांना पाच जुलै पासून वाढीव वेतन …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटीतील त्या १५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार विधानसभेत एसटी महामंडळाच्या भांडार खरेदीत घोटाळा प्रकरणी चर्चेत दिली माहिती

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीत मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. विशेष लेखापरीक्षण पथकाने केलेल्या तपासणीत २२ कर्मचारी आणि अधिकारी दोषी आढळले आहेत. यापैकी १५ कर्मचारी आणि अधिकारी सध्या कार्यरत असून, उर्वरित ७ निवृत्त झाले आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांवर चौकशी करणे शक्य न झाल्याने …

Read More »

रोहित पवार विधानसभेत म्हणाले, अजित पवार यांनी, अपनों को किया पराया निधी वाटपावरून लगावला टोला

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ५४ हजार कोटींच्या मागण्या सादर करण्यात अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केल्या. त्यावरील चर्चेला आजपासून सुरूवात करण्यात आली. यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बोलताना राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना कर्जत-जामखेडला चांगला निधी येत होता. मात्र आता अजित पवार यांनी अपनो को किया पराया अशी स्थिती …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, बीडमधील लैंगिक शोषणाची एसआयटी चौकशी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची तात्काळ कारवाई

बीड येथील कोचिंग क्लास अर्थात शिकवणी वर्गात झालेल्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्यात येईल,  अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे का, यात कोणाचा वरदहस्त आहे का हे देखील तपासले जाईल. मुलींना न्याय मिळावा यादृष्टीने योग्य प्रयत्न करू. …

Read More »

नाना पटोले यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेतून सभात्याग

आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नांवरुन महायुती सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, राज्यावरील आर्थिक बोजा वाढला, आर्थिक संतुलन ढासळलं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्यांवरून सरकारला धरले धारेवर

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारला पहिल्या दिवशी धारेवर धरले आहे. राज्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे, सरकारचे आर्थिक संतुलन ढासळलं आहे त्यामुळे राज्यातील गरिबांवर, …

Read More »

अंबादास दानवे यांची स्पष्टोक्ती, राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, हिंदी भाषेची सक्ती सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर, महाविकास आघाडी सरकारचा बहिष्कार

राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रती सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात, हिंदीची होत असलेली सक्ती यामुळे सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज …

Read More »