भारत आणि पाकिस्तान दोघांनीही शत्रुत्व संपवण्यास सहमती दर्शविल्याशिवाय व्यापार थांबवण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन करताना, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) मंगळवारी (१३ मे २०२५) सांगितले की, अमेरिकन अधिकाऱ्यांशी व्यापाराबाबत कधीही चर्चा झाली नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भारताने भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरील राष्ट्राध्यक्ष …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या संबोधना आधी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत-पाक युद्ध आम्ही थांबवले दोन्ही देशांशी भरपूर व्यापार करणार असल्याचे सांगत दोन्ही देशांना युद्धबंदीसाठी प्रवृत्त केले
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय लष्कराने हल्ला केला. त्यास पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केले. मात्र या दोन्ही देशांच्या दरम्यान सुरु झालेल्या युद्धात अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मध्यस्थी करत भारत-पाकमध्ये युद्धबंदी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करण्याच्या काही वेळ आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला थेट नाव घेत इशारा, टेरर आणि टॉक एकाचवेळी नाही पाकिस्तानने त्यांच्या देशातील अतिरेक्यांची स्थळे उद्वस्त करावीत
पहलगाम येथील बैसरण व्हॅलीतील दहशतवादी हल्ल्याला प्रत्यु्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशवाद्यांचे अड्डे भारताने उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्ताने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतावरही हल्ले करण्यास सुरुवात झाली. अखेर या युद्धग्रस्त तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मध्यस्थीने अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. त्यानंतर आज पहिल्यांदाच देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांचा ८ पीएमवरून खोचक टोला भारत-पाकिस्ताना शस्त्रसंधीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार
मागील महिन्यात पहलगाम येथील बैसरण व्हॅलीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना प्राणास मुकावे लागले. त्यानंतर या हल्ल्याचा बदला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना विविध पद्धतीने इशारे देत त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची घोषणा केली. त्यानंतर ७ मेला भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित ९ दहशतवादी तळांवर हल्ले करत दहशतवादी तळ उद्धवस्त …
Read More »भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी बीएसई २९७५ अंकानी तर एनएसई ९१६ अंकानी वाढला
बेंचमार्क शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात तेजीनंतर बंद झाले, सेन्सेक्सने गेल्या वर्षातील सर्वोत्तम तेजी नोंदवली. भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीमुळे ही तेजी वाढली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला. दिवस अखेर एस अँड पी बीएसई सेन्सेक्स २,९७५.४३ अंकांनी वाढून ८२,४२९.९० वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० ९१६.७० अंकांनी वाढून २४,९२४.७० वर बंद झाला. …
Read More »शस्त्रसंधीमुळे आयपीएलचे सामने पुन्हा सुरु होणार १६ मेपासून आयपीएल सामने पुन्हा सुरु करण्याच्या विचारात बीसीसीआय
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय १६ मे पासून इंडियन प्रीमियर लीग – आयपीएल सामने पुन्हा सुरू करण्याचा आणि स्पर्धा ३० मे पर्यंत वाढवण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आठवडाभर स्थगिती दिल्यानंतर चालू हंगाम थांबवण्यात आला होता. उर्वरित सामन्यांसाठी चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद अशी …
Read More »भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी मागे अमेरिकाः पंतप्रधान मोदी यांनी सिमला करार मोडला? अमेरिकेच्या सहभागासंदर्भात अद्याप कोणतीच भारताकडून भूमिका नाही
पहलगाम येथील बैसरण व्हॅलीतील पर्यटकांवर पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ला करत २६ जणांचे प्राण घेतले. त्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचबरोबर १९६० च्या दशकात भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधू नदी करार निलंबित करत असल्याचेही जाहिर केले. या पार्शवभूमीवर पाकिस्ताननेही १९७२ चा सिमला करार रद्द करण्याची घोषणा केली आणि …
Read More »शस्त्रसंधी, अमेरिकाः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यांची मागणी अधिवेशन बोलवा काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या प्रयत्नांना काँग्रेसचा तीव्र आक्षेप
काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना काँग्रेसने आज तीव्र आक्षेप घेतला. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवित सर्व पक्षियांची बैठक बोलवावी आणि त्यास स्वतः उपस्थित रहावे व संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावी अशी मागणी केली. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि …
Read More »शस्त्रसंधी उल्लंघन प्रत्युत्तरासाठी लष्कर प्रमुखांचे कमांडरला पूर्ण अधिकार डिजीएमओच्या बैठकीत भारतीय लष्कर प्रमुखांचे आदेश
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या एका दिवसापेक्षा कमी कालावधीत, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी पश्चिम सीमेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही उल्लंघनाला तोंड देण्यासाठी तेथे तैनात असलेल्या लष्करी कमांडर्सना “पूर्ण अधिकार” दिले. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या काही भागात स्फोट झाल्याचे वृत्त आले. “१० मे …
Read More »जयराम रमेश यांची मागणी, युद्धबंदीची माहिती पंतप्रधानांनी सर्वपक्षिय बैठकीत सामायिक करावी काँग्रेस, डाव्या पक्षांची मागणी केंद्र सरकारकडे मागणी
शनिवारी (११ मे २०२५) रोजी, भारत आणि पाकिस्तान यांच्यात जाहीर झालेल्या युद्धबंदीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्वपक्षियांबरोबर सामायिक करावी असे आवाहन करत पुढील वाटचालींच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही यावेळी विरोधकांनी केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, वॉशिंग्टन डी.सी. कडून झालेल्या “अभूतपूर्व घोषणा” लक्षात …
Read More »
Marathi e-Batmya