रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित …
Read More »अजित पवार म्हणाले की, मराठा समाजासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील
“मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने पहिल्या दिवसापासून सकारात्मक व संवेदनशील भूमिका घेतली होती. आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने सतत प्रयत्न केले. त्या अनुषंगाने मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशींवर तातडीने निर्णय घेऊन आज शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुढे बोलताना …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले अन्य महत्वाचे निर्णय राजगड सहकारी कारखान्याच्या कर्जास मान्यता, यशवंत सहकारी कारखान्याच्या जमिन विक्रीस मान्यतासह अनेक निर्णयाला मंजूरी
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक राजकारणाशी संबधित निर्णयाला मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजगड सहकारी साखर कारखान्याच्या ४०२ कोटी ९० लाखांच्या कर्जास मान्यता, यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्रीस मंजुरी, बीड जिल्ह्यातील तीन बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्यास मान्यता, बीड जिल्ह्यातील आष्टी येथे वरिष्ठ …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टीका,… खरे लायर दिल्लीत तर महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर सुप्रीम कोर्टाने निर्देश देऊनही अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधी द्वेषाची काविळ झाली असून मोघलांना जसे धनाजी संताजी दिसत होते तसे भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना दिवसरात्र राहुल गांधीच दिसत आहेत, त्याच भितीपोटी ते दररोज राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात. खरे लायर तर दिल्लीत बसले असून महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर बसले आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे शेतकऱ्यांना आवाहन, आत्महत्या करू नका; शेतकरी मेल्याचे सरकारला सोयर सुतक नाही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?
राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत. परंतु भाजपा युती सरकारला त्याचे काहीच सोयर सुतक नाही. राज्यातले सरकार फक्त गेंड्याच्या कातडीसारखे निगरगट्टच नाही तर आंधळे, मुके व बहिरे आहे. या सरकारला भ्रष्टाचारापुढे शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा युतीचे सरकार हे शेतकरीविरोधी आहे. अदानी, अंबानीच्या फाईलवर सह्या करणाऱ्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित …
Read More »अजित पवार यांचा धर्मनिरपेक्षतेचा नारा, तर खासदार सुनेत्रा पवार रा.स्व.संघाच्या कार्यक्रमाला हजेरी कंगणा राणौत यांनी दिली माहिती, प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांसमोर जोडले हात
साधारणतः काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने आमची विचारधारा फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा असून आम्ही धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावरून सातत्याने मांडली. परंतु त्यांच्याच पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असून त्यांनी चक्क राष्ट्रीय …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृत्रिम बुध्दीमत्तेचे आव्हान…शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्वीकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमकेसीएल’च्या नावीन्यपूर्ण आणि विकासाभिमूख उपक्रमांत राज्य शासनही अग्रेसर राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बाणेर येथील बंटारा भवन येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) …
Read More »अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग चा घेतला आढावा
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच राज्यातील पावसाने प्रभावित झालेल्या इतर भागातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले …
Read More »आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले… जमिन वाटप, अतिक्रमण निश्चित, कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्याचा निर्णय
कालपासून सातत्याने हवामान विभागाच्या हवाल्याने राज्य सरकारकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येत होता. त्याअनुषंगाने राज्य सरकारकडून सातत्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला तयार राहण्याचे आदेश देण्यात येत होते. मात्र राज्यात एकाबाजूला पावसाने थैमान घालत असताना मात्र दुसऱ्या बाजूला राज्यातील मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत आपल्या कामसू वृत्तीची चुणूक की, हट्टाहास …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन, नागरिकांनो खबरदारी घ्या राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा
राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, घाबरून जाऊ नये. सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आज केले. पुढे बोलताना अजित …
Read More »
Marathi e-Batmya