Tag Archives: ajit pawar

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मे पाठोपाठ जून महिन्यातही कर्ज ? आर्थिक जमवाजमव करण्यासाठी वित्त विभागाची दमछाक

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोविड विरोधी लढ्याला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसा कमी पडू नये यासाठी राज्य सरकारने सर्व योजनांसाठीचा निधी, अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार राखीव ठेवण्यात आलेला निधी आतापर्यत वापरला. मात्र लॉकडाऊनमुळे राज्याची गंगाजळी आटल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मे महिन्यात कर्ज काढण्यात आले. आता पुन्हा एकदा जून महिन्याच्या पगारीसाठी कर्ज …

Read More »

राज्यातील रूग्णवाढीचा दर ११ दिवसांवरून १७ दिवसांवर २४८७ नवीन रुग्ण, ८९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता. तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्केवर आला असून २ हजार ४८७ रूग्णांचे निदान झाले …

Read More »

राज्य सरकारकडूनही तीन टप्प्यातील अनलॉक जाहीर : ३ जूनपासून सुरू होणार मुंबई-पुणेतील परिस्थिती लक्षात घेवून केंद्राचे नियम बदलले

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने काल तीन टप्प्यातील अनलॉकची मार्गदर्शक तत्वे जाहीर केल्यानंतर आज राज्य सरकारकडूनही अनलॉकबाबतची नियमावली जाहीर केली. त्यानुसार केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे रात्रो ९ ते पहाटे ५ पर्यत कर्फ्यु कायम राहणार आहे. मात्र मुंबई, पुणे येथील वाढती चिंताजनक परिस्थिती पाहता केंद्रांच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्राने जारी …

Read More »

घरी जाणाऱ्या रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ मात्र मृतकांची संख्या सर्वाधिक एकूण संख्या ६२ हजारवर पोहोचत अॅक्टीव्ह रूग्ण ३३ हजारावर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून आज तब्बल ८ हजार ३८१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र दुसऱ्याबाजूला याच आजाराने मृत पावणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून आज २ हजार ६८२ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ११६ रूग्ण २४ तासात मृत …

Read More »

पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी, रोजदांरी, कंत्राटीसह सर्वांना ५० लाखाचे विमा संरक्षण कोरोनाविरुद्धच्या लढाईत यापूर्वी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे अनुदान देणार - अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खाजगी, कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारी बांधवांना ५० लाख रुपयांचे विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना …

Read More »

रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्याच, पण रस्त्यांवरही खड्डे नकोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई: प्रतिनिधी सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करावे तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईसह राज्यातील कोणत्याही भागात रस्त्यावर खड्डे …

Read More »

पुण्यातील मंडळांनी घेतलेल्या या निर्णयाचे मुंबईसह महाराष्ट्राने अनुकरण करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन आणि आवाहन

मुंबई : प्रतिनिधी पुण्याचं सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधी, सदस्यांचं अभिनंदन केलं असून जाहीर आभारही मानले. राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच …

Read More »

मान्सूनचे मुंबईत ११ जूनला आगमन १८ जून पर्यंत राज्यात पोहोचणार

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मे महिना संपण्यासाठी अवघे १० दिवस शिल्लक राहीलेले आहेत. लॉकडाऊन असला तरी आणि सततच्या तापमान वाढीमुळे नागरिकांना धड घरातही बसता येईना आणि बाहेरही जाता येईना. मात्र आता नागरिकांना दिलासादायक वृत्त असून यंदा मान्सूनचे ११ जूनला मुंबईत आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यादृष्टीने पिकांचे नियोजन करावे …

Read More »

अन्नधान्याची गरज आणि आर्थिक संकटातून मुक्तीसाठी आता कृषी क्षेत्रावरच भिस्त राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने पुढील काळासाठी कृषी विभागाने आखणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले तर कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत भाजपावाल्यांनो ‘काळे झेंडे’ आंदोलन हा कोरोना योद्धाचा अपमान- अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त कोरोना योध्दांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्र …

Read More »