Tag Archives: anil deshmukh

मुख्यमंत्री आणि पवारांमुळे अखेर बिहार, प.बंगालचे कामगार पोहोचले घरी गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात अडकून पडलेल्या बिहार आणि पश्चिम बंगालच्या कामगारांना ठाम नकार देण्यात येत होता. मात्र यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्तीशं बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधल्याने या कामगारांना त्यांच्या मुळ घरी जाता आले. …

Read More »

संभावित संकटे-परिस्थितीवर शरद पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, मंत्र्यांची चर्चा लॉकडाऊनमधली आव्हाने, अर्थचक्र गतिमान करण्याला प्राधान्य

लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य …

Read More »

गृहमंत्री देशमुख, रेल्वे तिकिटांची विक्री नसताना मजूरांकडून पैसे कोण घेतय? जनतेची शंका दूर करण्याची भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी एक व्हिडिओ जारी करून केंद्र सरकारवर टीका केली व रेल्वेने कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नयेत अशी मागणी केली. या संदर्भात माधव भांडारी म्हणाले की, अनिल देशमुख जनतेची दिशाभूल करत आहेत. लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्यांची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक …

Read More »

जप्त केलेले मास्क, हँड सॅनिटायझर, पीपीई कीट्स रूग्णालयांना द्या काँग्रेस नेते मोहन जोशी यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे माहिती सादर करण्याचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी सरकारच्या विविध खात्यांनी जप्त केलेली पीपीई कीट्स वापरात आणण्यासाठी खुली करावीत याकरीता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर राज्य सरकारने याबाबत माहिती द्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.पी.कोलाबावाला यांच्या …

Read More »

पवारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांचे केले कौतुक चांगले काम करत असल्याची शाबासकीची थाप

मुंबई: प्रतिनिधी राज्यावर आलेले कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विशेषत: अजित पवार हे चांगले चांगले काम करत आहेत. तसेच मंत्रिमंडळातील त्यांचे इतर सहकारीही चांगले काम करत असल्याची शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मारत त्यांचे कौतुक केले. समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधताना त्यांनी या …

Read More »

सेलिब्रिटींबरोबर प्रकाश आमटे, गृहमंत्री, म्हणतात “ये दिन भी ढल जायेंगे” मराठी सेलिब्रिटींकडून हिंदी गाण्यातून राज्यातील जनतेला गाण्यातून दिलासा

समृध्दी पोरे लिखित आणि दिग्दर्शित “ये दिन भी ढल जायेंगे” गाण्यातून डॉ. प्रकाश आमटे-मंदाकिनी आमटे, गृहमंत्री अनिल देशमुख,  प्रसिध्द गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत, स्वरूप भालवणकर, जानव्ही प्रभू अरोरा, किर्ती किल्लेदार यांनी खास राज्यातील जनतेला दिलासा दिला. Share on: WhatsApp

Read More »

एकामुळे दुसऱ्या मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारीही अंडर ऑब्जर्व्हवेशनखाली ? मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी नेले

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही राज्य मंत्रिमंडळातील काही बेजबाबदार सदस्यांकडून नको त्या गोष्टींची उठाठेव केली जात आहे. सदर या मंत्र्यांमुळे त्यांच्याच सहकारी मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाच्या अंडर ऑब्जर्व्हव्हेशन खाली जावे लागल्याची माहिती मंत्रालयातील प्रत्यक्षदर्शीने दिली. राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री कोरोना निगेटीव्ह-पॉजीटीव्ह असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सतत सुरु …

Read More »

बेकायदेशीर वागणाऱ्यांकडून २ कोटी ३० लाखांची तिजोरीत भर कोविड संदर्भात ६० हजार गुन्हे दाखल -१३ हजार व्यक्तींना अटक तर ४१ हजार वाहने जप्त

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २०एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६० हजार ५ गुन्हे दाखल झाले आहेत. तर १३,३८१ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४१,७६८ वाहने जप्त करण्यात आली असून विविध गुन्ह्याखाली बेकायदेशीर वागणाऱ्यांकडून २ कोटी ३० लाख रूपयांचा दंड आकारण्यात  आल्याची …

Read More »

अमित शाह, फडणवीस बोलले…देशमुख यांची हकालपट्टी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्याची मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी व या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी …

Read More »

१५०० पोलिसांच्या पदोन्नतीला मुहूर्त सापडेना १० फेब्रुवारीला आदेश काढूनही पुर्तता नाही

मुंबई: प्रतिनिधी नि:शस्त्र पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय अर्हता परीक्षा- २०१३ मधील पात्र असलेल्या १५०० उमेदवारांची उप निरीक्षक पदी पदोन्नती रखडली आहे. या यादीत सर्वाधिक ५६३ पदे ही मुंबई पोलीस आयुक्तांलयाच्या अंतर्गत येत असून पुण्यात ९४ पदोन्नतीची प्रकरणे आहेत. ही पदे तत्काळ भरण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली …

Read More »