मुंबई : प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज …
Read More »कोरोनामुळे नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे वर्षभरातील किमान एक अधिवेशन नागपूरात घेतले जाते. त्यानुसार नियोजित हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाय येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नियोजित नागपूरचे अधिवेशन यंदा मुंबईत घेण्याचा निर्णय आज झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे लगेच तर उर्वरित वेतन लवकरच परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आज काही रक्कम जमा करण्यात आली असून सध्या एक महिन्याचे वेतन साधारणतः एका तासाभरात त्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे. तर उर्वरित थकित पगारीसाठी बँकेकडे आणि इतर वित्तीय संस्थांकडे कर्ज घेण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरु असल्याची माहिती परिवहन मंत्री …
Read More »पोलिसांच्या ‘फोर्स वन’ ला या तीन पध्दतीने प्रोत्साहन भत्ता मिळणार त्यांच्या आयुष्याची काळजी घेऊ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी विघातक हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या ‘फोर्स वन’ मधील शूर जवान, अधिकारी, कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोग काळातील दरानेच प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य …
Read More »मुंबईतल्या फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण करणार मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यापूर्वी २०१४ मध्ये असे सर्व्हेक्षण झाले होते. आता सर्व्हेक्षणासंदर्भातील समित्यांमध्ये नगरसेवक, पदाधिकारी यांनाही स्थान देण्यात येईल. याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, …
Read More »ST कर्मचाऱ्यांचे थकित वेतन दिवाळीपूर्वी देण्यासाठी महामंडळाचा असाही विचार परिवहन मंत्री, ॲड.अनिल परब यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन दिवाळीपूर्वी देणे ही सध्याची प्राथमिकता असून प्रसंगी महामंडळाला यासाठी कर्ज काढावे लागले तरी चालेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले. ते पुढे म्हणाले की,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीचे उत्पन्न घटले आहे. परंतु अशा परिस्थितीत …
Read More »पवारांचे आश्वासन एसटी कर्मचाऱ्यांना, पण निधीसाठी परिवहन मंत्री भेटणार पुन्हा अर्थमंत्र्यांना दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यासाठी संघटनेच्या नेत्यांनी केली शरद पवारांशी चर्चा
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात सर्वप्रथम लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊन काळात सर्वच परिवहन सेवा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे मागील पाच महिन्यापासून विनावेतन एसटी कर्मचारी काम करत आहेत. मध्यंतरी अर्थमंत्री अजित पवार यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी भेटून एक महिन्याच्या पगाराची …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, आपण सगळे घेवूया ‘MAH कसम’ कोरोनाविरूध्दची लढाई निर्णयाक वळणावर असल्याने आजही मास्क हीच आपल्यासाठी लस
रत्नागिरी : प्रतिनिधी कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मा कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या …
Read More »बेस्टची राज्याच्या मंत्र्यांवर अशीही मेहेरबानी लॉकडाऊन काळात वीज बीलेच पाठविले नसल्याची माहिती उघड
मुंबई : प्रतिनिधी शहरात वीज पुरवठा करणारी बेस्ट वीज कंपनीने सामान्य नागरिकांना लॉकडाउनमध्ये जादा रक्कमेची विद्युत देयके पाठविल्याची तक्रार सर्वश्रुत आहे. पण त्याच बेस्ट प्रशासनाने राज्यातील मंत्र्यांना लॉकडाउन कालावधीतील ४ ते ५ महिन्याची विद्युत देयकेच पाठविली नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. सार्वजनिक बांधकाम …
Read More »शिवसेनेने अर्णब गोस्वामी विरोधात हक्कभंग ठराव आणल्याने भाजपा आक्रमक सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब
मुंबई: प्रतिनिधी हिंग्लीश भाषेतील रिपब्लिक वृत्तवाहिनेचे संपादक-अॅकर असलेले अर्णब गोस्वामी हे सातत्याने राज्यातील नेते, मुख्यमंत्री यांच्याबाबत एकेरी शब्दात उल्लेख करत असून चुकीच्या पध्दतीचे वृत नेहमी प्रसारीत करत आहेत. त्यांच्याकडून सुपारी घेतल्यासारखे वृत्तांकन करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी करत गोस्वामी विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव आणण्यात आला. हा ठराव आणताच भाजपाचे …
Read More »
Marathi e-Batmya