काँग्रेस खासदार गौरव गोगोई, त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख यांच्यात ‘गहन संबंध’ आहेत आणि आयबीकडून मिळालेली माहिती गुप्तपणे शेजारील देशाला पुरवण्यात आली असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी असाही …
Read More »कामाख्या रेल्वे एक्सप्रेस रुळावरून घसरलीः एकाचा मृत्यू अनेकजण जखमी, ११ डब्बे रूळावरून घसरल्याने अपघात
ओडिशाच्या कटकमधील नेरगुंडी स्थानकाजवळ बंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याने रविवारी किमान एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. ईस्ट कोस्ट रेल्वे (ECoR) च्या सूत्रांनी सांगितले की, सकाळी ११.५४ च्या सुमारास रुळावरून घसरले. ईसीओआर अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीची ओळख पश्चिम बंगालचे रहिवासी शुभंकर रॉय म्हणून केली आहे. एका महिला …
Read More »गौतम अदानी यांचे आसाम मध्ये ५० हजार कोटी गुंतवणूकीचे वचन विमानतळा, शहर गॅस आणि वीज वितरण, रस्ते बांधकाम यात करणार गुंतवणूक
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आसाममध्ये विमानतळ, विमान शहरे, शहर गॅस वितरण, वीज पारेषण, सिमेंट आणि रस्ते बांधकाम अशा ५०,००० कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणुकीचे वचन दिले आहे. “आम्हाला आसामच्या प्रगतीच्या गाथेचा भाग होण्यास उत्सुकता आहे. आम्ही आसाममध्ये ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करू,” असे अदानी यांनी मंगळवारी अॅडव्हांटेज आसाम शिखर …
Read More »राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यप्रकरणी गुन्हा दाखल फाईटिंग इंडियन स्टेट वक्तव्य प्रकरणी आसाममध्ये गुन्हा
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाषण करताना फाईटिंग इंडियन स्टेट असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरून नुकसाच आसामची राजधानी गुवाहाटी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोनजीत चेतिया नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली, ज्याने गांधींवर “अस्थिरता आणि फुटीरतावादी भावनांना उत्तेजन देणारी धोकादायक …
Read More »हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा, लव्ह जिहाद प्रकरणी जन्मठेपीची शिक्षा नवा कायदा आसामसाठी आणणार
मागील १० वर्षापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात लव्ह जिहाद प्रकरणावरून भाजपाने रान माजविण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात भाजपाला राजकिय यशही मिळाले. मात्र आता आसाम मध्ये लव्ह जिहाद प्रकरणावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लव्ह जिहादच्या विरोधात जन्मठेपेची शिक्षा देणारा नवा कायदा आणणार असल्याची घोषणा …
Read More »आसाममधील पुरात ११४ वन्य प्राण्यांचा मृत्यू ९५ प्राण्यांची पुरातून सुटका
काझीरंगा नॅशनल पार्क (KNP) आसामच्या पुरात ११४ वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, एका अधिकाऱ्याने सांगितले की, ९५ इतर प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत काझीरंगा नॅशनल पार्क KNP मधील प्राण्यांचा मृत्यू ७७ वर पोहोचला आहे. पुरामुळे चार गेंड्यांचा मृत्यू झाला, तर ९४ हरणं (हॉग डियर) बुडाले. तर इतर ११ जनावरांचा …
Read More »रतन टाटा म्हणाले, सेमी कंडक्टर उत्पादनामुळे आसाम जगाच्या नकाशावर
उद्योगपती आणि परोपकारी रतन टाटा म्हणाले की टाटांनी आसाममध्ये सेमी कंडक्टर उत्पादन केल्याने राज्य जागतिक नकाशावर येईल. आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी टाटा सन्सचे एमेरिटस चेअरमन रतन टाटा आणि चेअरमन एन चंद्रशेखरन यांची भेट घेतली आणि सेमीकंडक्टर सुविधा उभारल्याबद्दल त्यांचे आभार मानले. रतन टाटा यांनी आपल्या एक्स ट्विटवर आपले मत व्यक्त …
Read More »राहुल गांधी यांनी ठणकावले, आणखी ५० गुन्हे दाखल करा, मी घाबरत नाही
मणिपूरहून १४ जानेवारी २०२४ रोजी झालेली भारत जोडो न्याया यात्रा उद्या पश्चिम बंगालमध्ये पोहोचत आहे. दरम्यान आसाममधील यात्रेच्या प्रवासा दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर विविध कलमांखाली जवळपास ५० गुन्हे दाखल केले. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी येथील जाहिर सभेत बोलताना भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ …
Read More »नाना पटोले यांची टीका, राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखण्याचे कृत्य सत्तेचा…
भारत जोडो यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला असून या भितीतून भारत जोडो न्याय यात्रेवर भ्याड हल्ले करण्यात येत आहेत. आज राहुल गांधी आसाममधील मंदिरात दर्शन करण्यास जात असताना त्यांना मंदिरात जाऊ दिले नाही. मंदिरात जाण्यास आता भाजपाची परवानगी …
Read More »आसाममध्ये राहुल गांधी यांना मंदिर प्रवेश नाकारला
एकाबाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करोडो लाखो-रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या राम मंदिरात राम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सकाळपासून अयोध्येत शासकिय राजशिष्टाचाराला डावलून मग्न राहिले. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सध्या सुरु असलेल्या भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून पुढे सरकत आहे. परंतु आसाम नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री श्री शंकरदेव …
Read More »
Marathi e-Batmya