हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा, लव्ह जिहाद प्रकरणी जन्मठेपीची शिक्षा नवा कायदा आसामसाठी आणणार

मागील १० वर्षापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात लव्ह जिहाद प्रकरणावरून भाजपाने रान माजविण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात भाजपाला राजकिय यशही मिळाले. मात्र आता आसाम मध्ये लव्ह जिहाद प्रकरणावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लव्ह जिहादच्या विरोधात जन्मठेपेची शिक्षा देणारा नवा कायदा आणणार असल्याची घोषणा केली आहे.

आसाम मधील भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना हिमंता बिस्वा सरमा यांनी घोषणा केली.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आम्ही निवडणुकीदरम्यान ‘लव्ह जिहाद’बद्दल बोललो होतो. लवकरच, आम्ही असा कायदा आणू, जो अशा प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा देईल. लवकरच नवीन अधिवास धोरण आणले जाईल, ज्या अंतर्गत केवळ आसाममध्ये जन्मलेले लोक राज्य सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र असतील.

पुढे बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, निवडणूकपूर्व आश्वासनानुसार प्रदान करण्यात आलेल्या “एक लाख सरकारी नोकऱ्या” मध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळाले आहे, जे संपूर्ण यादी प्रकाशित झाल्यावर स्पष्ट होईल असेही सांगितले.

आसाम सरकारने हिंदू आणि मुस्लिमांमधील जमीन विकण्याबाबतही निर्णय घेतला असल्याचे सांगत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, सरकार अशा व्यवहाराला रोखू शकत नसले तरी पुढे जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची संमती घेणे बंधनकारक केले आहे.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *