Tag Archives: balasaheb thorat

आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी रियल टाइम नोंदणीमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना अचूक नुकसान भरपाई आणि मदत देणे शक्य होणार

मुंबई : प्रतिनिधी शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्ज ही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही …

Read More »

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी २७ जुलै रोजी होणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित …

Read More »

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा केंद्र सरकारविरोधात काँग्रेस नेत्यांची राजभवनसमोर निदर्शने, राज्यपालांना निवेदन सादर

मुंबई: प्रतिनिधी देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅक करून हेरगिरी केली जात आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सहकारी, इतर विरोधी पक्षांचे नेते यांचीही हेरगिरी करण्यात आलेली आहे. संविधानाने दिलेल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारावरचा हा हल्ला तर आहेच, परंतु लोकशाही …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे निर्देश: ३ री लाट आली तरी उद्योग, अर्थचक्र, जीवनचक्राची गती कायम ठेवा उद्योगक्षेत्र सुरळित सुरु राहील याचे काटेकोर नियोजन करा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, त्याचा एक परिपूर्ण आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या उद्योगाच्या आवारात करण्याची तयारी पूर्ण करावी व ज्यांना हे …

Read More »

मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने सायकल प्रवास करत राज्यपालांना दिले निवेदन इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार इंधन, गॅस, खाद्यतेल डाळींची महागाई करून जनतेला आर्थिक कमजोर करत आहे. कोरोनामुळे लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असताना महागाईच्या ओझ्याखाली गोरगरिब, मध्यमवर्ग, नोकरदारही पिचला गेला आहे. इंधनावरील कराच्या रुपाने केंद्र सरकार आपली झोळी भरत असून दररोजच्या महागाईने जनतेचे मात्र कंबरडे मोडले असून मोदी सरकार …

Read More »

काँग्रेस लवकरच विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवार ठरविणार ओबीसीचा डाटा केंद्र सरकारने तात्काळ जाहीर करावा !- एच. के. पाटील

मुंबई: प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षपदावरून कसलाही वाद नाही, ठरल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाकडेच अध्यक्षपद आहे आणि ते काँग्रेसकडेच राहिल. आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनीही तसे स्पष्ट केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात कोविडमुळे अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही. परंतु लवकरच ही निवडणूक पार पडणार असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील …

Read More »

मोदी सरकारमुळे वर्षात २७ कोटींपैकी २३ कोटी लोक पुन्हा गरीबी रेषेच्या खाली इंधनावरील करातून कमावलेल्या २५ लाख कोटी रुपयांचे काय केले? : मल्लिकार्जून खर्गे

मुंबई: प्रतिनिधी डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात २७.१ कोटी लोकांना गरिबी रेषेच्यावर आणले होते. मात्र मागील वर्षी २३ कोटी लोक गरिब रेषेच्या खाली ढकलेले गेले आहेत. युपीए सरकारने १० वर्षात कमावलेले सर्व काही अवघ्या एका वर्षात मोदी सरकारने घालविल्याचा आरोप करत मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ९७ टक्के कुटुंबाचे उत्पन्न घटले आहे. …

Read More »

कृषी सुधारणा विधेयके विधानसभेत सादर विधेयकावर जनता, शेतकरी, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या सूचना मागवल्या

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतक-यांच्या नाही तर फक्त मुठभर मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. या कायद्यामुळे शेतकरी उद्धवस्त होणार आहे. वास्तविक पाहता कृषी संबंधी कायदे हा राज्यांचा विषय असून केंद्र सरकारने त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांना वाचवण्यासाठी व शेतक-यांच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी …

Read More »

बेरोजगारांसाठी खुषखबर! १५ हजार ५११ रिक्त पदे एमपीएससी मार्फत भरणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात विविध विभागांमध्ये १५ हजार ५११ अ, ब, क वर्गातील जागा रिक्त असून या सर्व जागा एमपीएससी आयोगाच्या मार्फत लवकरच भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत करत एसईबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा वाढविण्यात आल्यामुळे उमेदवारांच्या जास्तीची नोकरी सेवा करता …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना सवाल, ठराव केला तर तुम्हाला का मिर्च्या झोंबल्या? ओबीसीप्रश्नावरून झालेल्या गोंधळानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील ओबीसींचे संपुष्टात आलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी केंद्राकडे असलेला इम्पिरियल डेटा मागण्याचा ठराव आम्ही केला. पण तुम्हाला का मिर्च्या झोंबल्या ? असा सवाल करत जी माहिती अधिकृतपणे राज्य सरकारकडे नाही ती माहिती तुमच्याकडे कशी आली असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना …

Read More »