Tag Archives: bhima koregaon

भीमा-कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीची परस्परविरोधी भूमिका एनआयएला तपास देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा

मुंबईः विशेष प्रतिनिधी पुणे येथील भीमा-कोरेगांव येथील हिंसाचार प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडून एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्याचा निर्णय केंद्राने घेतला. केंद्राच्या या निर्णयास राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला. मात्र महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणाचा तपास एनआयएला सुपूर्द करण्याची भूमिका घेतल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगत …

Read More »

भीमा कोरेगांव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महाविकास आघाडी सरकारकडे मागणी

पुणेः प्रतिनिधी एक वर्षापूर्वी पुण्यात एल्गार परिषद झाली. त्यानंतर भीमा कोरेगांव येथे दंगल झाली. मात्र यासंपूर्ण प्रकरणात पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह असून त्यांच्याकडून अधिकाराच गैरवापर झालेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. केवळ नक्षलवादाच …

Read More »

भीमा कोरेगाव, इंदू मिल आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या पीपल्स रिपाईचे जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आणि पीपल्प रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनामार्फत केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

हिंदूत्ववाद्यांसाठी दलाली करणाऱ्या केंद्रीय मंत्री आणि डांगळेंच्या बैठकीवर बहिष्कार घाला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून साहित्यिक, विचारवंत, विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीचे पडघड वाजायला सुरुवात झालेली असतानाच निवडणूकीत आपल्याच पक्षाचा वरचष्मा रहावा यासाठी प्रत्येक राजकिय पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि दलित साहित्यिक अर्जून डांगळे यांनी आंबेडकरी विचारधारेवर आधारीत संस्थेची उभारणी करण्याकरीता एका बैठकीचे आयोजन केले. मात्र …

Read More »

शरद पवारांना नक्षलवाद्यांचा पुळका का ? भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशाची घटना आणि संसदीय लोकशाही नाकारणाऱ्या नक्षलवाद्यांचा पुळका का आला ?, की आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महागठबंधनचा धुव्वा उडणार असल्याच्या भीतीने पवारांनी आता ही वेगळी वाट स्वीकारली का? असा सवाल भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. शरद पवार यांनी पुण्यात …

Read More »

अनुसूचित जातीसह मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार

सत्तेच्या राजकारणात प्रत्येकजण राजकीय महत्वकांक्षा ठेवून राजकारणात येतो. परंतु राजकारणात असून कोणतीही राजकिय महत्वकांक्षा मनाशी न ठेवता केवळ ज्या समाजातून आपण आलो. त्या समाजातील प्रत्येक घटकाला, वंचिताला आणि उपेक्षिताला त्याच्या न्याय हक्काबरोबरच त्याला स्वत:च्या पायावर उभ करता यावे या उद्देशाने आपल्या पदाचा आणि राजकिय वजनाचा उपयोग करणारे सामाजिक न्याय आणि …

Read More »

विजयस्तंभाला मानवंदना देण्यास येणाऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधा द्या

सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे सामाजिक न्याय मंत्री बडोले यांचे आदेश पुणे : प्रतिनिधी येथील भिमा-कोरेगांव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येतो. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उच्च प्रतीच्या मुलभूत सोयी सेवा-सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री …

Read More »

महार बटालियन आणि शौर्याचा इतिहास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा खास लेख

आताच्या नवबौध्द आणि पूर्वाश्रमीच्या महार जातीच्या पराक्रमी इतिहासाची मोठी परंपरा आहे. लढवय्या महारांना आपल्या पुर्वजांकडून मिळालेल्या अंगभूत नैसर्गिक साहसी गुणामुळे त्यांनी आपला इतिहास घडवता आला. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा सर्वच आघाड्यांवर प्रस्तापितांच्या अन्यायाविरोधी दिलेली कडवी झुंज याची साक्ष आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या …

Read More »

आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी गटात दंगल घडविण्याचा सरकारचा प्रयत्न भारिपचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात हिंदू व मुस्लिम अशी धार्मिक दंगे होत नाहीत. त्यामुळे आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी यांच्यात जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आज बुधवारी केला. भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्याचे सत्र राज्य …

Read More »

संभाजी भिडेला वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांचा सरकारकडूनच बनाव ? गृह विभागाला सांगून खोटा अहवाल बनविल्याची दबक्या आवाजात मंत्रालयात चर्चा

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगांव येथे दलितांच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात नक्षलवादी गुंतल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला. मात्र या हिंसाचाराच्या मागील असलेला प्रमुख संशयित आरोपी संभाजी भिडेला अटक करण्याऐवजी त्याना वाचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या गृह विभागाला सांगून नक्षलवाद्यांकडून …

Read More »