भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी केले. चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज पुढील पाच वर्षात राज्यात दरवर्षी वीज बीलाची रक्कम कमी होणार
२०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतक-यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. तसेच वर्धा जिल्ह्यात अप्पर वर्धा प्रकल्प, …
Read More »वक्फ कायदा विरोधी हिंसाचारः आतापर्यंत १५० जणांना अटक रात्री छापा मारून आणखी काही जणांना अटक केल्याची पोलिसांची माहिती
पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबाद जिल्ह्यात रविवारी विध्वंसाचे दृश्ये घडली, निर्जन रस्त्यांवरून निमलष्करी दल गस्त घालत होते. वक्फ कायद्यामुळे सुरू झालेल्या हिंसक निदर्शनांमुळे जिल्ह्यात तणाव आहे. वाढत्या अशांततेला प्रतिसाद म्हणून, कलकत्ता उच्च न्यायालयाने जिल्ह्यातील सर्वात संवेदनशील भागात निमलष्करी दल तैनात करण्याचे आदेश दिले. अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोडी झाल्याचे वृत्त मान्य …
Read More »पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून हिंसाचारः तिघांचा मृत्यू मुर्शिदाबाद मध्ये १५ पोलिस जखमी ११८ जणांना अटक
संसदेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक मंजूर झाल्यानंतर सुरू झालेल्या निदर्शनांचे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसाचारात रूपांतर झाले, जिथे तीन जणांचा मृत्यू झाला, १५ पोलिस कर्मचारी जखमी झाले आणि ११८ जणांना अटक करण्यात आली. शांततेचे आवाहन करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना “धर्माच्या नावाखाली गैर-धार्मिक कृत्य” करू नका असे आवाहन केले आणि राज्यात …
Read More »रायगडावरील कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी केल्या या मागण्या त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे दोन मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रायगड किल्ल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे ही उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भोसले यांनी अमित …
Read More »ममता बँनर्जी यांची घोषणा, पंतप्रधान मोदी यांच्या वक्फ कायद्याची अंमलबजावणी करणार नाही एक्सवरून दिला इशारा, दंगलग्रस्त भागातील पाहणीनंतर एक्सवरील ट्विटमधून दिली माहिती
नरेंद्र मोदी सरकारने राज्यात नव्याने लागू केलेल्या वक्फ कायद्याची अंमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर करून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त भागात जाऊन शांततेचे आवाहन केले. एक्स वर ट्विट करत मुख्यमंत्री ममता बँनर्जी म्हणाल्या की, “आम्ही या विषयावर आमची भूमिका स्पष्ट केली आहे – आम्ही या कायद्याचे …
Read More »कर्मठ आणि अभ्यासू म्हणणारे फडणवीस यांच्या वक्तव्याचा अमित शाह यांच्याकडूनच त्रिफाळा तिलक महाराज कोण, शिवाजी महाराजांची जयंती कोणी सुरु केली? अमित शाह यांना यांना अचूक माहिती द्या
फार पूर्वी २०१४ पूर्वीच्या कोणी एके काळी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात आणि भारत देशावरही होती. परंतु सत्ता राखण्यासाठी आणि जातीय समिकरणं कायम राखण्यासाठी खोट्या माहितीचा आधार घेतल्याची चर्चा कधी ऐकिवात नाही. पण सध्या महाराष्ट्रात आणि भारताच्या केंद्रातील सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून खोट्या माहितीचा प्रचार सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच छत्रपती शिवाजी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची आता राष्ट्रपतींनाच डेडलाईन तामिळनाडूतील डिएमके सरकार आणि राज्यपाल रवी वाद प्रकरणी न्यायालयाचे आदेश
राज्यपालांनी पाठवलेल्या राज्य विधेयकांना मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना तीन महिन्यांची मुदत दिली आहे. राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींकडे विचारार्थ पाठवल्याच्या दिवसापासून घड्याळाचे वेळापत्रक सुरू होईल. “या कालावधीपेक्षा जास्त विलंब झाल्यास, योग्य कारणे नोंदवून संबंधित राज्याला कळवावी लागतील,” असे सर्वोच्च न्यायालयाने ८ एप्रिलच्या निकालात म्हटले आहे. राज्यांनीही केंद्राकडून …
Read More »रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा कायापालट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त
भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अभ्युदय नगर पुनर्विकासात किमान ६२० चौ.फूटाची सदनिका निविदा प्रक्रियेला गती देण्याचे आदेश
मुंबईतील अभुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान ६२० चौ.फूट प्रमाणे करुन नव्याने निविदा काढण्यात याव्यात व ही निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार प्रविण दरेकर, अजय चौधरी, माजी आमदार बाळा …
Read More »
Marathi e-Batmya