मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकूण चाचण्यांची संख्या कायम ठेवताना मुंबईतील चाचण्यांची संख्या मात्र ५० टक्क्यांहून अधिक संख्येने कमी करण्यात आल्या आहेत आणि आता राज्यात कोरोनाबळींची संख्या झपाट्याने वाढत आहे, याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून लक्ष वेधले आहे. मुंबईत मृत्यू …
Read More »मिशन बिगीन अगेनमध्ये मुंबईसह राज्यात या सवलती नव्याने मिळणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून घोषणा
मुंबई: प्रतिनिधी रूतलेल्या अर्थव्यवस्थेला चालना आणि थांबलेले जनजीवन पुन्हा एकदा सुरुळीत व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेत काही गोष्टी शिथीलही केल्या. मात्र आता त्यात नव्याने काही सवलती समाविष्ट करण्यात आल्याने मिशन बिगीन अगेन आणखी सुसह्य झाला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अधिक सवलती खालीलप्रमाणे- पहिल्या टप्यात-बाग-बगीछे, …
Read More »राज्यातील १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक तर १२ हजार ६६८ च्या निवडणूका स्थगित ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील एप्रिल, मे आणि जूनमध्ये मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भात ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून राज्यपालांकडे तशी शिफारस करण्यात येत असल्याचे सांगत …
Read More »आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार प्रत्येकी १ हजार रुपये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रत्येकी १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यातील गावांमध्ये सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मे पाठोपाठ जून महिन्यातही कर्ज ? आर्थिक जमवाजमव करण्यासाठी वित्त विभागाची दमछाक
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोविड विरोधी लढ्याला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसा कमी पडू नये यासाठी राज्य सरकारने सर्व योजनांसाठीचा निधी, अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार राखीव ठेवण्यात आलेला निधी आतापर्यत वापरला. मात्र लॉकडाऊनमुळे राज्याची गंगाजळी आटल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मे महिन्यात कर्ज काढण्यात आले. आता पुन्हा एकदा जून महिन्याच्या पगारीसाठी कर्ज …
Read More »मुंबईसह राज्याचे रक्षण करणाऱ्यांचे आभार मानत, मुख्यमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याची मुख्यमंत्री ठाकरेनी दिली माहिती
मुंबई: प्रतिनिधी ‘निसर्ग ‘ चक्री वादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणतात, “महाराष्ट्रावर करोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्री वादळाचा तडाखा बसला.संकट म्हटले तर मोठे होते. पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता व प्रशासनाने झूंज दिली व …
Read More »हिंदुस्थान युनिलिव्हरने दिली १० कोटीहुन अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार
मुंबई: प्रतिनिधी हिंदुस्थान युनी लिव्हर लि. कंपनीने गेल्या सप्ताहात राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला मिळून १० कोटी रुपयांहुन अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत केली. यामध्ये ५.०४ कोटी रुपयांच्या २८ हजार ८०० टेस्टिंग किटसचा समावेश आहे तर आणखी ५ कोटी रुपये किंमतीची विविध वैद्यकीय संसाधनेही त्यांनी उपलब्ध करून दिली. यामध्ये …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंचा निर्णय राज्यपाल कोश्यारींनी केला रद्दबातल विद्यापीठ कायद्यानुसार अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याचे आदेश
मुंबई: विशेष प्रतिनिधी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्दबातल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केला. मात्र या निर्णयावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भविष्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय रद्दबातल करत विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे परिक्षेच्या कारणावरून …
Read More »खाजगी रूग्णालयानों रूग्णांना बेड नाकारताय, BMC वॉच करतेय पालिकेचे अधिकारी नियुक्त करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी कोरोना उपाययोजनांवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. मुंबईतील खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या ८० टक्के बेडस राखीव ठेवण्याच्या शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे यासाठी अशा सर्व रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नियुक्त करून नियंत्रण करावे व रुग्णांची हेळसांड होणार नाही असे पाहावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले. तर …
Read More »७० पैकी ३० हजारापेक्षा जास्त घरी गेले, तर ३७ हजाराहून अधिक अॅक्टीव्ह रूग्ण २३६१ नवे रूग्ण, तर ७६ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज नव्याने २ हजार ३६१ रूग्ण आढळून आले आहे. तर ७६ जणांचा मागील २४ तासात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ७० हजारावर पोहोचली असून यापैकी ३० हजार १०८ रूग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. ३७ हजार ५३४ रूग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश …
Read More »
Marathi e-Batmya