मुंबई: प्रतिनिधी दादरा-नगर हवेलीचे प्रशासकाकडून झालेल्या जाचामुळे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट मागे आत्महत्या केल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवार आणि स्व.मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी तब्बल ५० हजाराहून अधिक मताधिक्कांनी विजय मिळविला असून या निमित्ताने शिवसेनेने पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर आपले खाते उघडले. …
Read More »राज्य सरकारच्या निर्णयानुसार कोणत्या शहरात किती असणार नगरसेवक? जाणून घ्या महानगरपालिका आणि नगरपरिषदांमधील लोकसंख्यानिहाय नगरसेवकांची संख्या
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिकांमध्ये दोन ते तीन सदस्यीय प्रभाग तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय पध्दतीचे प्रभागाच्या निर्णयानंतर पक्षिय बलाबल वाढावे यासाठी २०११ च्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहर आणि तालुकास्तरावरील लोकसंख्येच्या प्रमाणात कोणत्या शहरात किती नवे नगरसेवक असतील त्याची माहिती …
Read More »मविआ सरकारचा मोठा निर्णय: महानगरपालिका- नगरपरिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढवली महानगरपालिकांमध्ये १७५ तर नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्के वाढ
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर …
Read More »एफआयआरच्या माध्यमातून त्रास देण्याचे थांबविणे ही आपली गरज लेखन: स्वामिनाथन एस. अंकलेसरीया अय्यर
देशात आपल्या प्रतिस्पर्धी आणि टीकाकारांना शांत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी कायद्यातील अनेक तरतूदींचा गैरवापर केला आहे. सोशल माध्यमातून किंवा अन्य उच्च दर्जाच्या माध्यमातून ट्रोल करणे, शोषण करणे, बलात्काराच्या धमक्या देणे आदी तंत्राचा वापर करण्यात येत आहे. सद्यपरिस्थितीत अशा पध्दतीचे तंत्र वापरणारा भाजपा एकमेव पक्ष ठरू शकतो, मात्र त्यासाठी इतर …
Read More »नवे पुरावे गंभीर, आर्यन ड्रग प्रकरणाची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात नव्या पुराव्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून विशेषतः …
Read More »फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयात वसुलीसाठीच संघाचे लोक नेमले होते का? राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ३०० कोटींची लाच देऊ करणारा रा. स्व. संघाचा ‘तो’ व्यक्ती कोण? अतुल लोंढे
मुंबई: प्रतिनिधी जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एक व्यक्ती व अंबानी यांच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची लाच देण्याचा प्रस्ताव होता, असा गौप्यस्फोट मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला. मलिक यांना कोट्यवधी रुपयांची लाच देऊ करणारा रा. स्व. संघाशी निगडीत तो व्यक्ती कोण आहे? …
Read More »मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही साधला एनसीबीवर निशाणा
मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन ठेवली असून मंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा करणे मुश्कील झाले आहे. काँग्रेसने या महागाईविरोधात वारंवार आंदोलने केली पण मोदी सरकारला जाग आलेली नाही. आता पुन्हा एकदा झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी १४ ते २९ …
Read More »वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याविषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भातील बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार नाना पटोले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ …
Read More »नाना पटोलेंची अंतर्गत टीम तयार नवनियुक्त पदाधिका-यांकडे सोपविल्या जबाबदा-या काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी अतुल लोंढे, तर मिडिया कम्युनिकेशन जाकिर अहमद यांच्याकडे
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची व डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या कामात सुसुत्रता व वेग यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची …
Read More »जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण ही मोदी सरकारचे प्रचंड अपयश दर्शवणारी !: सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी विकासाची खोटी स्वप्नं दाखवत सत्तेत आलेल्या मोदी सरकारची कामगिरी कोणत्याच क्षेत्रात उल्लेखनीय झालेली नसून सर्वच क्षेत्रात घसरण होत आहे. अर्थव्यवस्था, जीडीपी, रुपयाच्या घसरणीनंतर आता जागतिक भूक निर्देशांकातही भारताची घसरण झाली आहे. जगातील ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या स्थानावर आहे. ही घसरण मोदी सरकारचे प्रचंड अपयश दर्शवणारी आहे, अशी …
Read More »
Marathi e-Batmya