Tag Archives: congress

कोविडमुळे राहिलेला शब्द अजित पवारांनी केला पूर्ण: आमदारांना दसऱ्याचे गिफ्ट आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी: एक कोटींची भरघोस वाढ

मुंबई: प्रतिनिधी कोविड काळामुळे आलेल्या आर्थिक अडचणीमुळे रखडलेला आपला शब्द निर्बंधात दिलेल्या सवलतीं आणि आर्थिक बाजार सुरळीत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी पूर्ण करत सणासुदीच्या ऐन तोंडावर आमदारांच्या विकास निधीत घसघशीत वाढ करत ४ कोटींचा करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील सर्व पक्षिय आमदारांना ही दसऱ्याची भेट ठरली …

Read More »

… तसा प्रकार लखीमपूरला झाला नाही आयकर छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचा बंद: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे : प्रतिनिधी राज्यात गेले पंधरा दिवस चालू असलेल्या आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंदचे आवाहन करण्यात आले. तथापि, जनतेचा मनापासून प्रतिसाद नसल्याने बंद फसला आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून पुकारलेल्या या बंदच्या विरोधात भाजपाची …

Read More »

भाजपाचा ढोंगीपणा उघड झाल्याने त्यांना शेतकरीप्रश्नी बोलण्याचा अधिकार नाही शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी व शेतक-यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातील जनतेने व व्यापा-यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतक-यांच्या न्यायाच्या लढाईला प्रचंड पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून शेतक-यांना न्याय मिळवून देईपर्यंत संघर्ष करत …

Read More »

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंद ही तर सुरुवात आहे पण….. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी साधला केंद्र सरकावर निशाणा

मुंबई : प्रतिनिधी मागील आठ ते दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचं आंदोलन, ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून, दिल्लीत लाल किल्ल्यावर पोहचण्यापर्यंत. लोकांची सहनशीलता आता संपलेली आहे. शेतकरी विरोधी जे कायदे केंद्र सरकारने केलेले आहेत, त्याबाबत खूप लोकांच्या मनात रोष आहे, नाराजी आहे आणि कायदे बदलण्यासाठी केंद्र सरकार अजिबात …

Read More »

काँग्रेस नेत्यांचे राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन ‘महाराष्ट्र बंद’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूर पद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या …

Read More »

काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना जनतेचे चोख उत्तर जिल्हा परिषद निवडणुकीतील यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून ही तर सुरुवात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. निवडणूक …

Read More »

आदिवासी पारधी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध काँग्रेसला राज्यात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीची गरज !: नाना पटोले

मुंबईः प्रतिनिधी पारधी समाजाकडे पाहण्याचा पूर्वापार दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. या समाजावर गुन्हेगारी समाज असा शिक्का मारला गेला आहे ती ओळख बदलून त्यांना माणूस म्हणून जगता आले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा वंचित, शोषित समाज घटकांना न्याय देणारा पक्ष असून राज्यातील आदिवासी पारधी समाजाच्या शिक्षण, रोजगार, राहण्याची सोय अशा सर्वांगिण विकासासाठी …

Read More »

पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटणे भाजपाच्या राज्यात गुन्हा आहे का ? उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे तालिबानी राज !: नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखालील तालीबानी राज असल्याचा …

Read More »

नरिमन पाँईटमधील एका टॉवरमध्ये ठरतात महाविकास आघाडीची धोरणे पुणे-मुंबईतले दोन उद्योजक, काही आयएएस अधिकारी आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत होते बैठक

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कामकाज चालवित असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील दोन बडे मंत्री मुंबई-पुणे येथील ठराविक उद्योजकांच्या इशाऱ्यावर महत्वाची धोरणे तयार करत असून मंत्रालयातील काही आयएएस अधिकारीही त्या बैठकांना आवर्जून हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे या सर्व बैठका नरिमन पाँईट येथील एका टॉवर …

Read More »

… मला महाराष्ट्रातला मंत्री असल्यासारखं वाटतंय नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

अहमदनगर : प्रतिनिधी केंद्रात रस्ते महामार्ग विभागाचा मंत्री झाल्यापासून माझ्याकडे अनेकजण रस्त्याची कामे घेवून येत आहेत. कधी विमानाने, तर कधी रेल्वेने तर मी महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक जण मला या गावाला जोडणारा रस्ता करून द्या, माझ्या मतदारसंघातून जाणारा महामार्ग द्या अशी असंख्य आमदार, खासदार भेटून माझ्याकडे कामे आणून देत असतात. मात्र …

Read More »