Tag Archives: congress

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, महाराष्ट्रात विधान सभेची झालेली निवडणूक ही मॅच फिक्सिंग राज्यातील महाराष्ट्र विरोधी सरकार घालवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यांचे स्वागत

महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती, या निवडणुकीत नेमकी काय झालं याचं सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले आहे. दम असेल तर यावर खुलासा करावा असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान, …

Read More »

राहुल गांधी यांच्या लेखातील आरोपावर निवडणूक आयोग म्हणते, प्रतिकूल निकाल…बदनामी अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी सूत्रांकडून काऊंटर

देशातील लोकसभा निवडणूकीनंतर सहाच महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूकीत जाहिर झालेल्या आकडेवारीपासून ते भाजपाला मिळालेल्या विजयाबाबत सर्वत्र आश्चर्य सर्वचस्थरातून व्यक्त करण्यात आले. याशिवाय अनेक गोष्टींबाबत संशय व्यक्त करण्यात येवू लागला. यासंदर्भात काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अनेक विषयांबाबत माहिती मागितली. पण त्याबाबत निवडणूक आयोगाकडून काँग्रेस पक्षाला मागितलेली माहिती अद्याप दिली नाही. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, विधानसभा निवडणुकीतील फिक्सिंगची चौकशी का करत नाही? निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भाजपाचे अमित शाह व देवेंद्र फडणवीस का देतात? निवडणूक आयोग गप्प का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. अचानक वाढलेले मतदान हे अनौरस, बोगस असल्याने काँग्रेस पक्षाने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली पण चौकशी काही केली जात नाही. राहुल गांधी यांनी संसदेत व संसदेबाहेरही हा प्रश्न लावून धरला आहे. आज देशभरातील प्रमुख …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मुख्यमंत्री योगींनी माफी मागावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा राज्यात नंगानाच, या विकृत प्रवृत्तींचा कडेलोट करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्मांच्या लोकांना समान स्थान होते. सर्वधर्मसमभावाची हीच संकल्पना संविधानात आहे, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते. पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा आज महाराष्ट्रात नंगानाच सुरु आहे. भाजपाचे सरकार असतानाच या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. या प्रवृत्तीचा आतापर्यंत समूळ नायनाट …

Read More »

अनंत गाडगीळ यांचा सवाल, मोदी सरकारमध्ये नव्या पाणबुड्यांना अजूनही मंजुरी का नाही ? १५ पाणबुड्यांचे आयुष्य ७ ते ८ वर्षापर्यतचेच

धक्कादायक बाब म्हणजे भारतीय नौदलाकडे असलेल्या एकूण पाणबुड्यांपैकी जवळपास १५ पाणबुड्यांचे आयुष्य हे आता केवळ ७ ते ८ वर्षापर्यंतच मर्यादित आहे. याशिवाय ३ ते ४ पाणबुड्या पुढील ५ वर्षात निवृत्त कराव्या लागतील अशा अवस्थेपर्यंत पोहोचल्या आहेत. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून एकही पाणबुडी निर्मिती वा खरेदीचा निर्णय घेतलेला नाही, हे खरे आहे का? याचा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, ५५ हजार कोटींचा समृद्धी महामार्ग ७० हजार कोटींचा कसा झाला? समृद्धी भ्रष्ट महामार्गाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल

देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५  हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, ट्रम्प यांचा फोन आला, नरेंद्र मोदींनी आत्मसमर्पण केले युद्धबंदीवरून राहुल गांधी यांची खोचक टिका

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आणि असा दावा केला की ऑपरेशन सिंदूर दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोनवरून त्यांनी आत्मसमर्पण केले. काँग्रेसच्या संघटना सर्जन अभियानादरम्यान गांधी भोपाळमध्ये बोलत होते, जिथे त्यांनी काँग्रेससाठी खरोखर लढू इच्छिणाऱ्या परंतु त्यांचे ऐकले जात नसलेल्या पक्ष नेत्यांच्या निराशेची …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन तात्काळ मागे घ्या, थेट जनसुनावणी घ्या सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता एमआरटीपी MRTP चे उल्लंघन

भाजपा युती सरकारने मंजूर केलेला धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन हा पूर्णपणे अन्यायकारक आहे. सार्वजनिक पद्धतीने सल्लामसलत न करता, धारावीतील सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमांचे (MRTP) स्पष्टपणे उल्लंघन करीत सरकारने या प्रकल्पाला दिलेली मंजुरी धक्कादायकच नाही तर असंवैधानिक आणि अनैतिक आहे. हा मास्टर प्लॅन सर्वसमावेशक …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, … पंचनाम्याचे सोपस्कर कशाला ? कृषी मंत्रालय ओसाड गावची पाटीलकी तर बागायती विभाग कोणता?

महाराष्ट्राला मन्सूनपूर्व पावसाने झोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. शेतकऱ्यांचे मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संकटात त्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे म्हणून पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला …

Read More »

अनंत गाडगीळ यांचा आरोप, लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील मोदी सरकारने घालविलेली पत भारतीय सैन्याने सावरली

भारतामध्ये हवाईदलाला लागणाऱ्या सामुग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार केले जातात, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे सदर सामुग्री हवाई दलास पुरविलीच जात नाही. ही बाब खुद्द भारताच्या हवाईदल प्रमुखांनीच दिल्लीतील एका कार्यक्रमात नुकतीच स्पष्ट्पणे मांडल्याचे काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी सांगितले. अनंत गाडगीळ पुढे म्हणाले की, २०२१ साली …

Read More »