Tag Archives: devendra fadnavis

वादग्रस्त असूनही मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मिळाली ‘ही’ खाती सत्तारांकडे कृषी तर राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन

शिंदें-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या ऐन तोंडावर बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची टीईटी परिक्षेच्या घोटाळ्यात मुलींची नावे पुढे आली. तर शपथविधी सोहळ्यानंतर संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपाच्याच महिला नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंपद मिळणार का? किंवा संजय राठोड …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतरांकडे ‘ही’ खाती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सहीनंतर जाहीर

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास १३ खाती ठेवण्यात आली आहेत. यापैकी मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही …

Read More »

जयंत पाटील प्रति सेनाभवनावरून म्हणाले, ताकद मोठी पण देव पहिल्या सेनाभवनात… पूजा अर्जा करण्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमावा

जवळपास सव्वा महिना होत आला राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न होवून. मात्र या सव्वा महिन्यात जितकी चर्चा एकनाथ शिंदे यांच्या उठावाची झाली तितकीच त्यांच्या प्रार्थनास्थळांना भेटी देण्याचीही झाली. तसेच आता शिवसेनेला प्रत्युत्तर म्हणून प्रतिसेनाभवनही बांधण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे गटाकडून करण्यात आली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता …

Read More »

अजित पवार म्हणाले, सध्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा एकच आवडता शब्द… शहिद आणि सरकारच्या भवितव्यावरून अजित पवार यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला जवळपास सव्वा महिना पूर्ण झाला. त्यानंतर या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला. परंतु या मंत्र्यांना अद्याप खात्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळ गावी अर्थात तापोळा-दरे गावात स्थानिक नागरीकांकडून नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बंड करताना थोडाजरी …

Read More »

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिंदे गट आणि आमचे… सांगितली भविष्यकालीन योजना

राज्यात सत्तांतर होताच भाजपामध्येही आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला असून मागील काही काळापासून चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून नारळ देत भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील ओबीसी चेहरा असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपविली आहे. तर दुसऱ्याबाजूला मुंबईच्या अध्यक्ष पदावरून मंगलप्रभात लोढा यांना हटवून त्यांच्या ठिकाणी आशिष …

Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली नेमणूक

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच त्यांनी मुंबई भाजपा अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मंत्री तथा मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे व आशिष शेलार यांचे अभिनंदन केले व त्यांना …

Read More »

अजित पवार यांच्या ‘त्या’ मागणीने प्रशासनाला प्रश्न, उत्तरांना मान्यता कोण देणार? विधिमंडळाकडून उत्तरे पाठविण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून ३९ दिवस झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. आता मंत्रिमंडळ विस्तार होवून तीन दिवस होत आले तरी अद्याप मंत्र्याना खाते वाटप झालेले नाही. त्यातच १७ तारखेपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तरे न घेण्याची भूमिका घेणाऱ्या सरकारने आता प्रश्नोत्तरे घेण्याची …

Read More »

अमोल मिटकरी यांचा रवि राणा यांना टोला, देवेंद्र चालिसा म्हणा… राज्य मंत्रिमंडळातील सहभागावरून लगावला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसावरून रान पेटविणारे रवि राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचे भाजपाबरोबरील सख्य काही लपून राहिले नाही. तसेच हनुमान चालिसावरून उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला जेरीस आणणाऱ्या रवि राणा यांचा या नव्या सरकारमध्ये समावेश होईल असे सांगण्यात येत असताना पहिल्या …

Read More »

नाना पटोले म्हणाले, शिवसेनेने काँग्रेसशी चर्चा करायली हवी होती… शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१९ साली राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर स्थापन करण्यात आले होते. आता राज्यातील सत्तेची समिकरणे बदलली असली तरी महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबद्दल शिवसेनेने काँग्रेस पक्षाशी चर्चा करायला हवी होती. विरोधी पक्षनेते ठरवताना शिवसेनेने काँग्रेसशी …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा अनेकदा दिल्ली दौरा पण राज्यासाठी… शिवसेनेने विरोधी पक्षनेता निवडण्यापूर्वी आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करायला पाहिजे होती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या. मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची काहीच मागणी केली नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. विधान भवनातील विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »