आगामी मुंबई महापालिका निवडणूका नजरेसमोर ठेवत मुंबईतील मालमत्ता दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ या वर्षा करीता सुधारीत केला जाणार नसल्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम …
Read More »प्रेयसीच्या आत्महत्येचा तपास नीट होत नसल्याने प्रियकराचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्याने आष्टी येथील प्रौढाचा प्रयत्न
प्रेयसीने केलेल्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून नीट होत नसल्याचे गाऱ्हाणे घेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर गेला होता. मात्र तेथे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नसल्याने अखेर या प्रियकराने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. सुदैवाने मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर जाळी बसविण्यात आल्याने सदर व्यक्तीला कोणत्याही पध्दतीची फारशी …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारची आमदारांना खुली ऑफर, गडबड करायची नाही दुबईला प्लॅट मिळेल
राज्यात शिवसेनेचे बंडेखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होऊन चार महिने झाले. या चार महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० जणांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. राज्य सरकारची अनेक खात्यांना अद्यापही कॅबिनेट मंत्रीच नाही. तसेच राज्यमंत्र्यांची नियुक्ती तर नाहीच नाही. यापार्श्वभूमीवर …
Read More »अजित पवार अस्वस्थेततून आरोप करत आहेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ आहेत, त्यांच्या पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेते असल्याचे दाखविण्यासाठी ते काही तरी आरोप करत आहेत, असे सडेतोड प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व भाजयुमो प्रदेशाध्यक्ष …
Read More »भ्रष्टाचारमुक्त गरीब कल्याणाच्या योजना हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य
घर, शौचालय, गॅस, पाणी यासारख्या सुविधा कोणत्याही भ्रष्टाचाराविना गोरगरीबांपर्यंत पोहचविल्या हे मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील १० लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठवण्याच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले केंद्रीय मंत्र्यांना मोदी सरकारकडून मदत मिळतेय
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये राज्याने प्रभावी आणि पथदर्शी भूमिका बजावावी, अशी अपेक्षा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. दरम्यान, केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या पूर्ततेसाठी भरीव सहाय्य मिळत असून, राज्यातील विविध योजना केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण करण्यास प्राथमिकता दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट …
Read More »केंद्राचा तो प्रकल्प जाण्यामागचा घटनाक्रम काय? शिंदे-फडणवीसच याला जबाबदार शिंदे-फडणवीसांमुळेच राजकिय कुरघोड्यामुळे प्रकल्प गेला
मागील दोन-तीन दिवस राज्यातील केंद्र सरकारने देशभरातील सर्व राज्य आणि केंद्र शासित राज्यांना सौर ऊर्जा आणि अपांरपारीक ऊर्जेशी संबधित उत्पादन निर्मिती करण्यासंबधीच्या उद्योग निर्मितीचा १४०० कोटी रूपयांचा प्रस्ताव दिला. याबाबत विद्यमान उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्याचे सांगत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हा …
Read More »महेश तपासेंचा आरोप, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प जाण्याचा सपाटा…
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन सर्वाधिक गुंतवणूकीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला. त्यापाठोपाठ राज्यात येवू घातलेला बल्क ड्रग्ज् पार्क आणि तिसरा टाटाचा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला. या तिन्ही प्रकल्पावरून राज्यात राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. या प्रकल्प बाहेर पडण्याच्या यादीत आता आणखी एका प्रकल्पाची समावेश झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते …
Read More »भाजपा म्हणते, शिंदे-फडणवीसांच्या राज्यात दादागिरी सहन करणार नाही
एखाद्या चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करता येईल किंवा शांततामय पद्धतीने विरोधही करता येईल. पण चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्याची दादागिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कोणीही सहन करणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला. बावनकुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात …
Read More »विदर्भातील “या” तीन जिल्ह्यात कृषी पंपाचे दिवसाचे भारनियमन रद्द
चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुधीर …
Read More »
Marathi e-Batmya