महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने क्राइम वाढतोय. त्यात पुणे जिल्हा आहे. जी पुण्यात परिस्थिती आहे, तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाहीय. वर्दीची भिती राहिलेली नाही. कोण आहे त्यांच्यामागे? सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत. याचा शोध घेण्याऐवजी राज्य सरकार मौन बाळगते असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, शिंदेसेनेच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले भाजपाचा मोर्चा काँग्रेस कार्यालयावर आला असता तर त्यांना ‘हू किल्ड करकरे’ पुस्तक भेट दिले असते.
काँग्रेसला देशभक्तीचे प्रमाणपत्र गद्दारसेनेने देण्याची गरज नाही. काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा आहे तर पाकिस्तान निर्मितीच्या विचाराला पाठबळ देणारा विचार भाजपा व रा. स्व. संघाचा आहे. स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची मोहम्मद अली जीन्नाच्या मुस्लीम लिगशी युती होती, त्या मुस्लीम लिगच्या सरकारमध्ये भाजपा नेते श्यामा …
Read More »सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन, विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करावा समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्वत:चा विकास साधताना समाजातील मागास घटकांना पुढे घेवून जाण्याचे महान विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांनी दिले असून या विचारांचा अंगिकार करत विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व विकासासाठी दादासाहेब गायकवाड,दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे,सदानंद फुलझेले यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून …
Read More »कोल्हापूरकरांची उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी मान्य, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती उच्च न्यायालयाच्या चवथ्या खंडपीठाची स्थापना
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून, १८ ऑगस्ट २०२५ पासून ते कार्यान्वित होईल. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ६ जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असणार …
Read More »रामदास कदम यांच्या सावली डान्स बारचा परवाना परत केला अनिल परब यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा देताच पोलिसांची कारवाई
चोराने चोरलेला मुद्देमाल परत केला तरी कारवाई होणार, पण चोरी केलेल्या चोरावर काहीच कारवाई होत नसल्याचा घणाघात शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत केला. अनिल परब यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशात राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार असल्याचा आणि तो अद्यापही सुरु असल्याचा आरोप …
Read More »पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या बायोपिकसाठी २१ कोटी मंजूर चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यासाठी आर्थिक मान्यता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जीवनावर आधारित बहुभाषिक बायोपिक बनवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय जारी केला असून चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक मान्यता …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, भाजपा युती सरकार बेशरम व लाचार, राजीनामा न घेता क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच दहशतवादाला रंग देण्याचा भाजपाचा प्रयत्न, मालेगावचा खरा निकाल तर एक दिवस आधी गृहमंत्र्यांनी संसदेत दिला
राज्यातील भाजपा युती सरकार हे बेशरम व लाचार असून विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा सोडून क्रीडा मंत्रालय देऊन उचित सन्मानच केला आहे. आता रमी या खेळाला ऑलिंम्पिक दर्जा देतील व तो खेळणाऱ्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानितही करतील असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. लोकमान्य बाळ …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्रीय मंत्री पाटील यांना पत्र, अलमट्टीबाबत आदेश द्या पत्राद्वारे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आऱ. पाटील यांना हस्तक्षेपाची विनंती
कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत असे …
Read More »-मुख्यमंत्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खान अकॅडमी व श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत सामंजस्य करार दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षणातून राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रास नवी दिशा
राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व अनुभवाधिष्ठित शिक्षण मिळावे, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने ‘खान अकॅडमी’ आणि ‘श्री श्री रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या दोन नामांकित संस्थांशी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण दोन स्वतंत्र सामंजस्य करार (MoU) केले. या करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी …
Read More »सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पोलिसांवर गुन्हे दाखल करा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज एका महत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती विधिमंडळात देत अपराधी पोलिसांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवर निकाल देताना सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिसांवर गुन्हे …
Read More »
Marathi e-Batmya