Tag Archives: devendra fadnavis

अमित शाह यांचे आश्वासन, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू 'स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल

कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ‘उडान’ मुळे नागपूरतील मानसिक आरोग्य सेवांचे सशक्तीकरण टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उडाण अभियान

‘उडान’ या जिल्हास्तरीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाने नागपूर जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळवले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मानसिक आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्ट्सच्या सहकार्याने सुरू केलेल्या उडान उपक्रमांत मानसिक आरोग्याची जनजागृती वाढविणे, ग्रामीण व शहरी भागात सहज सेवा …

Read More »

महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा QR कोडच्या “साथी” प्रणालीद्वारे पारदर्शकतेला प्राधान्य

आगामी खरीप हंगामासाठी महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करणार असून, हे सर्व बियाणे केंद्र सरकारच्या “साथी” पोर्टलवर नोंदणीकृत असणार आहे. यासोबतच प्रत्येक बॅगवर QR कोड असणार असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना बियाण्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. QR कोड स्कॅन करताच शेतकऱ्यांना बियाण्याच्या मूळ स्त्रोतापासून उत्पादन प्रक्रिया, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, २०३० पर्यंत राज्यासाठी ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ घेऊन सज्ज-निती आयोगाची नवी दिल्लीत बैठक

विकसित भारत-२०४७ चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सोबत महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ साकार करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सज्ज असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. तसेच महाराष्ट्रात २०३० पर्यंत राज्यासाठी आवश्यक ५२ टक्के ऊर्जा ही हरित स्रोतांतून निर्माण केली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य पोलीस दलाला बळकटी देणाऱ्या इमारतीचे उद्घाटन

राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने ४० हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी …

Read More »

धुळेमध्ये सरकारी रेस्ट हाऊसमध्ये २ कोटींचे घबाड; एसआयटी चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही सत्य बाहेर आणू, अर्जुन खोतकर यांचे पीए निलंबित

धुळे जिल्ह्यातील एका सरकारी अतिथीगृहाच्या खोली क्रमांक १०२ मधून सापडलेल्या १ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम सापडली. या रकमेवरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी ही रक्कम शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर यांचेच पैसे असल्याचा आरोप केला. सदर रेस्ट हाऊसची ती खोली अर्जून खोतकर यांच्या …

Read More »

कर्जवाटप योजनेच्या नावाखाली लाभार्थ्यांना गंडा घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जवाटप योजनेच्या नावाखाली व्याज परताव्यासाठी लागणारे प्रमाणपत्र (एलओआय)  लवकरात लवकर देण्याचे आमिष दाखवून लाभार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती अण्णासाहेब महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र : ‘महाविस्तार एआय’ ॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनावश्यक बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती होत असल्यास त्या कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, युद्धबंदीवर उपस्थित प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही? शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू

देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिर गांधी व राजीव गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची …

Read More »

अखेर माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ

विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठा विजय मिळवित पुन्हा एकदा राज्यात सत्तास्थानी विराजमान झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यावरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात राजकिय वादाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र काल रात्री उशीरा …

Read More »