भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या ७, ८ आणि ९ या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड ७, ८, ९ ची निर्मिती करण्यात आली आहे. कॅबिनेट हॉलमध्ये …
Read More »पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना श्रद्धांजली
पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेष म्हणजे कालच यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत मागणी केली होती. सुप्रिया …
Read More »बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे दोन कोटी कागदपत्रे ऑनलाईन मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माहितीपत्रिकेचे अनावरण
बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) विविध आदेश, ना हरकत प्रमाणपत्रे आदी सुमारे २ कोटी ३२ लाख कागदपत्रे स्कॅनिंग करून डिजिटल स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. यासंबंधी माहिती देणाऱ्या माहिती पत्रिकेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्राधिकरणाची विविध कागदपत्रे एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने ‘एसआरए’ने केलेल्या या कामाबद्दल …
Read More »सुप्रिया सुळे यांची मागणी, दहशतवादी हल्ल्यातील कुटुंबियांना शौर्य पुरस्कार द्या कुटुंबातील एकाला शासकिय नोकरी द्या
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरविण्यात यावे. तसेच या कुटुंबातील व्यक्तींना राज्य सरकारने शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क’ दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा संपन्न
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात. शासनाचा जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, औद्योगिक विकास; सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार उद्योग पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान दिली ग्वाही
औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येईल. शेंद्रा आणि बिडकीनला जोडणारा इंडस्ट्रियल रिंगरोड तयार करुन, ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) क्लस्टरसाठी ५ एकर जागा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. औद्योगिक प्रदर्शन व …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन 'पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय' कार्यक्रमाचे
आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी ‘पुणे अर्बन डायलॉग’ सारखे मंथन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, फुले चित्रपट करमुक्त करा, शाळा-महाविद्यालयात दाखवा 'फुले’ हा चित्रपट केवळ एक चित्रपट नसून, एक एका महान पुरोगामी चळवळीचा इतिहास
‘फुले’ हा चित्रपट क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन, संघर्ष आणि विचारांवर आधारित प्रेरणादायी कलाकृती आहे. फुले दाम्पत्याने महिला व वंचित घटकाला शिक्षणाचे दरवाजे उघडले त्यासाठी त्यांना किती मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या संघर्ष आजच्या पिढीला समजला पाहिजे आणि ते फुले चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याची संधी आहे. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा अन्यथा कारवाई पोलिसांकडून देखरेख, थांबल्यास कारवाई केली जाईल
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे यास प्रत्युत्तरादाखल भारत सरकारने केलेल्या कारवाई करत भारतातील विविध भागात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करत ४८ तासात देश सोडण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि महाराष्ट्रात येऊन राहिलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासात देश सोडण्याचे आदेश देत तरीही मुंबई महाराष्ट्रात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठक
मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ‘बेस्ट’ची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी ‘बेस्ट’ने अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरविण्यासोबत स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर …
Read More »
Marathi e-Batmya