मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा अन्यथा कारवाई पोलिसांकडून देखरेख, थांबल्यास कारवाई केली जाईल

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे यास प्रत्युत्तरादाखल भारत सरकारने केलेल्या कारवाई करत भारतातील विविध भागात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करत ४८ तासात देश सोडण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि महाराष्ट्रात येऊन राहिलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासात देश सोडण्याचे आदेश देत तरीही मुंबई महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक थांबलेला आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे, त्यानंतरही ते राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक ६ पर्यटक हे महाराष्ट्रातील आहेत.

पाकिस्तानी कलाकारांबद्दल सहानुभूती नाही

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार केली आहे. ही यादी पोलिस ठाण्यांना देण्यात आली आहे. पाकिस्तानी व्हिसा असलेला कोणीही येथे ४८ तासांपेक्षा जास्त काळ राहू नये यावर लक्ष ठेवले जाईल. यानंतरही लोक थांबले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे सांगत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंबद्दल आम्हाला सहानुभूती नाही. पीएम मोदी जे काही बोलतात ते करतात. जेव्हा-जेव्हा हल्ला झाला, तेव्हा पंतप्रधान मोदींनी चोख प्रत्युत्तर दिल्याचेही यावेळी सांगितले.

राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार चपराक दिली

विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले आहे. वीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य बेजबाबदार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिले, पण तुम्ही त्यांच्याशी अशी वागणूक देत आहात, असे न्यायालयाने म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकारे राहुल गांधींना फटकारले आहे, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करत आहेत. त्यांनी वापरलेल्या भाषेमुळे देश दुखावला जातो. राज्यघटनेचे लाल पुस्तक घेऊन फिरणारे राहुल गांधी आता किमान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतील आणि वीर सावरकरांविरुद्ध बकवास बोलणे बंद करतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

शिवसेनेने उबाठा लक्ष्य केले

पहलगाम हल्ल्यासंदर्भात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधत म्हणाले की, या देशाचा इतिहास असा आहे की जेव्हा जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा सर्व राजकीय पक्ष एकत्र उभे राहतात. जेव्हा शत्रू हल्ला करतो तेव्हा आपल्या देशातील सर्व राजकीय पक्षांमध्ये मतभेद दिसत नाहीत, परंतु ज्या प्रकारे संकुचित विचारसरणीचे काम केले जात आहे, त्याला देशातील जनता कधीही माफ करणार नसल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *