भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेची लूट करण्याची एकही संधी सोडत नाही. जनता आधीच महागाईने त्रस्त असताना आता वाहनधारकांच्या खिशावर सरकारची नजर पडली आहे. वाहनांच्या हायसेक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली भरमसाठ शुल्क आकारले जात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर दुपटीपेक्षा जास्त असून हे शुल्क नाही तर ‘जिझिया’ करच आहे असा आरोप …
Read More »दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग कंपनीची नागपूरमध्ये १ हजार ७४० कोटींची गुंतवणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाशी सामंजस्य करार
महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्या दरम्यान १ हजार ७४० कोटीं रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगन आणि एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली. कंपनीने …
Read More »वक्फ बोर्ड निधीः शिंदे यांच्या काळात वाद, तर फडणवीसांच्या काळात निधी देऊनही शांतता आता कोण आंदोलन करणार, भाजपाशी संबधित कोणी बोलेचना
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांकडून आणि विविध राज्यातील राज्यांच्या सरकारकडूनही मुस्लिम धर्मियांना उद्देशून सातत्याने टार्गेट करणारी वक्तव्ये केली जात आहेत. त्यातच महाराष्ट्रातही नव्याने सत्तास्थानी विराजमान झाल्यापासून आणि त्यापूर्वीही भाजपाचे आमदार आणि बंदरे मंत्री नितेश राणे हे ही सातत्याने मुस्लिम धर्मिय लोकांना उद्देशून चितावणीखोर वक्तव्य करत असतात. मात्र …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करा कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा
नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सन २०२७ मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, ‘घाशीराम कोतवाल करो सो कायदा’ महाराष्ट्रात चालणार नाही पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली
राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच …
Read More »पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरूणीवर बलात्कारः घटनेचे राजकिय पडसाद विरोधकांकडून पुणे पालकमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीकास्त्रः आरोपीच्या भावाला घेतले ताब्यात
मुंबईनंतर सर्वाधिक गर्दी आणि वर्दळीचे शहर असलेल्या पुणे शहरातील स्वारगेट या प्रमुख एसटी बसस्थानकावर एका व्यक्तीने एका २६ वर्षिय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे पुणे शहर हादरले असून पुण्यात नेमकं पोलिसांच चाललय काय असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असून पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »सुषमा अंधारे म्हणाल्या, उज्वल निकम यांची नियुक्ती …. सत्यता नीट जाणून घ्या देशमुख हत्या प्रकरणी उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर सुषमा अंधारे यांची टीका
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर आनंद व्यक्त करण्याआधी कृपया सत्यता नीट समजून घ्या असे आवाहन शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाज माध्यमांवर एका पोस्टच्या माध्यमातून केले. त्यासाठी सुषमा अंधारे यांनी खैरलांजी प्रकरण, अजमल कसाब प्रकरणाचा दाखला देत …
Read More »संतोष देशमुख हत्ये प्रकरणी विशेष वकील उज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती मस्साजोगवासिय आणि देशमुख कुटुंबियांच्या सात पैकी एक मागणी सरकारकडून मान्य
गेल्या काही महिन्यापासून राज्यात गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांस अटक करण्यात आली. तसेच या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे वगळता इतर पाच ते सात आरोपींनाही अटक करण्यात आली. परंतु या हत्या प्रकरणातील आरोपींना कायदेशीर शिक्षा व्हावी म्हणून मस्साजोगमधील …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय न्यायालयाचा स्तर वाढविणे, गावठाणामध्ये सुविधा पुरविणे यासह घेतले महत्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत बहुतांश निर्णय हे पुणे जिल्ह्यातील आहेत. या निर्णयामध्ये पुणे जिल्ह्यातील पौड येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय होणार, पुनर्वसित ३३२ गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी ५९९ कोटी ७५ लाखांचा कृती कार्यक्रम, विविध विभागांकडील माहितीच्या प्रभावी, पारदर्शक वापरासाठी महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरण, प्राधिकरण स्थापन, …
Read More »महसूल विभागाच्या कारभाराविरोधात तरूणाची मंत्रालयाच्या ७ व्या मजल्यावरून उडी नव्या सरकारच्या पाशवी बहुमतानंतरही तरूणांचे कृत्य
राज्यात सत्तास्थानी विराजमान झालेल्या आणि भाजपा प्रणित महायुती सरकारला लोकांनीच निवडूण दिले असल्याचा दावा भाजपासह महायुतीतील सर्वच पक्षांनी केला. मात्र विरोधकांकडून ईव्हीएम मशिन्समधून घोटाळा करून निवडूण आल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मंत्रालयातील सर्वसामान्य जनतेची गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात नवी सुरक्षा व्यवस्था आणि प्रवेश पद्धत …
Read More »
Marathi e-Batmya