Tag Archives: devendra fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वॉररुम बैठकीत घेतला १५ प्रकल्पांचा आढावा प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉररुम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील १८ प्रकल्प आणि नवीन १५ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून, दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे काम व्हावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य घाटशीळ पारगाव येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्ताहासाठी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे ९३ व्या वर्षापासून सुरू आहे. या परंपरेच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. गहिनीनाथ गडाचा विकास करताना बीड जिल्ह्याला पाणीदार जिल्हा करणार …

Read More »

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते वितरण शंकुतला खटावकर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्राने उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा तसेच क्रीडा क्षेत्रातही देशाचे नेतृत्व केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांना लहान वयापासूनच विविध क्रिडाप्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, डिफेन्स क्लस्टर करून उद्योजकांच्या क्षमतांना चालना द्यावी संरक्षण सामग्री उत्पादनांमध्ये देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

उद्योगासाठी उत्तम परिसंस्था असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक धाडसी व कल्पक आहेत. येथे डिफेन्स क्लस्टर तयार करून त्यांच्यातील क्षमतांना चालना द्यावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना केला. मराठवाडा:आत्मनिर्भर भारत की रक्षाभूमी’, याविषयावर चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अग्रीकल्चर तर्फे आयोजित चर्चासत्रात फडणवीस बोलत …

Read More »

राज ठाकरे यांना न विचारताच एनईपी आणि हिंदीचा निर्णय; पाठिंबा काढून घेणार का? पाडव्याच्या सभेत निर्णय जाहिर भूमिका मांडूनही राज ठाकरे यांना भाजपाने दाखवला ठेंगा

देशातील अनेक राज्यांमध्ये त्रि-सुत्री भाषेचे तत्व मांडत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात एनईपी धोरण केंद्र सरकार अर्थात भाजपाने मांडले. या भाषिक त्री सुत्रीला हिंदी भाषिक राज्ये वगळता सर्वच दक्षिणेतील राज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र केंद्र सरकारकडून आर्टीफिशियल असलेली हिंदी भाषा बिगर हिंदी राज्यांवर लादण्याची आग्रही भूमिका स्विकारली आहे. …

Read More »

राज्यात टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू होणारः यंदाच्या वर्षीपासून ५+३+३+४ शिक्षण पद्धती लागू होणार

महाराष्ट्र सरकारने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० लागू करण्यास मान्यता दिली आहे. बुधवारी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या सरकारी आदेशात (जीआर) ही माहिती देण्यात आली. एनईपी NEP पारंपारिक १०+२ मॉडेलची जागा घेत एक परिवर्तनकारी ५+३+३+४ मॉडेल सादर करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरणाचा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, काँग्रेस मोर्चावर फडणवीस सरकारकडून दडपशाही खासदाराला पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर गृहमंत्र्यांनी माफी मागावी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना घाबरून मोदी सरकारने ईडीच्या माध्यमातून सोनियाजी गांधी व राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली आहे. भाजपाच्या तानाशाही कारभाराविरोधात मुंबईतील ईडी ED कार्यालयासमोर मुंबई काँग्रेसकडून शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येत असताना फडणवीस सरकारने पोलिसांचा वापर करून आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला. मला आणि …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा सीएमई प्रणालीसंदर्भात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सूचना

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण (सीएमई) प्रणालीच्या माध्यमातून त्यांचा परवाना नूतनीकरणासाठी क्रेडीट पॉईंट दिले जातात. याच अनुषंगाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना ग्रामीण भागात स्वेच्छा सेवेसाठी क्रेडीट पॉईंट द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, राज्यातील २० आयटीआय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार

राज्यातील २० आय.टी.आय मध्ये  अत्याधुनिक  प्रयोगशाळा उभारणे, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी  उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे,  राज्यातील आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी वाढवण्यात येणार आहेत. कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि श्री श्री ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट बेंगलोर, स्नायडर इलेक्ट्रिक …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती वडाळा येथील कोरबा मिठागर भागात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकात रमलेले आहे. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि बाबासाहेब यांचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादित केले. वडाळा पूर्व येथील कोरबे मिठागर भागात …

Read More »