Tag Archives: dy cm ajit pawar

अजित पवार यांचा इशारा, तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा… किती पैसे राहिले ते सांगायला नको काय़

कोरोनाच्या केसेस सध्या वाढायला लागल्या आहेत. रुग्ण वाढणे हे काळजीचं कारण आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. आज जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या तिन्ही लाटेत …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वेळ पडली तर बँकांचे मेळावे घ्या पण… वित्तीय वर्षासाठी बँकांकडून २६ लाख ३३ हजार कोटी रुपयांचा पत आराखडा

पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्जाची तातडीने आवश्यकता आहे ही बाब लक्षात घेऊन बँकांनी मिशनमोड स्वरूपात शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप करावे, आवश्यक असल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन यासाठी बँक मेळावे आयोजित करावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. त्यांनी कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास …

Read More »

अजित पवार म्हणाले; गोवंश संवर्धनाचे काम करा, आवश्यक निधी देणार देशी गाय व संशोधन केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे काम व्हावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय समाज व्यवस्थेत गोवंशाला अन्यन्यसाधारण महत्व आहे. शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देशी जातीच्या गोवंश संवर्धनाचे काम व्हावे. या केंद्रासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात देशी गाय संशोधन व …

Read More »

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा इशारा, आम्ही पण खूप काही बोलू शकतो… महाराष्ट्राची संस्कृती ती नाही

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केले असून महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. आम्ही पण खूप काही बोलू शकतो, पण आपल्या संस्कृतीचा विचार करुन गप्प बसतो असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित जनता दरबारानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील यांचे ते वक्तव्य त्यांच्या …

Read More »

अजित पवारांनी सांगितली व्हॅट करातून केंद्राला दिलेल्या महसूलाची आकडेवारी राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला

Ajit Pawar

व्हॅटचा निर्णय घेत असताना सरकारने रक्कम कमी केली. त्यात २४०० कोटी रुपयांचा महसूल सोडावा लागला. मुल्यवर्धित कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे असे असताना विरोधक अजून कपात केली पाहिजे असे बोलत आहे. परंतु राज्य सरकारने जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केल्याची राज्य सरकारची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज …

Read More »

तुम्हाला माहित आहे का? मंत्रालय आणि जिल्हा परिषदेत किती पदे रिक्त आहेत २ लाख ४४ हजार ४०५ पदे रिक्त सर्वाधिक पदे गृह विभागाची रिक्त

Mantralay

राज्याचे प्रशासकिय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील विविध विभागात आणि जिल्हा पातळीवरील जिल्हा परिषदांमधील विभागात किती पदे रिक्त आहेत याची माहिती सर्वसाधारणपणे कधी पुढे येत नाही. मात्र यावेळी पहिल्यांदाच राज्यातील विविध विभागात आणि जिल्हा परिषदअंतर्गत २.४४ लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात माहिती कायद्यातंर्गत शासकीय विभाग व जिल्हा परिषदेतील …

Read More »

जेजुरी विकासाच्या निमित्ताने गडावर या सोयी-सुविधा निर्माण होणार ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना पुरातत्त्वीय शैली जपावी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करताना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्त्वीय जाण असलेल्या संस्थेमार्फत ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

मविआ सरकारचाही मोठा निर्णय: पेट्रोल-डिझेलवरील करात आजपासून कपात कर कमी केल्याने सुमारे २५०० कोटींचे नुकसान

देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडण्याची वेळ आली. यापार्श्वभूमीवर वाढत्या महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलवरील व्हॅट करात ८ रूपयांची तर डिझेलच्या दरात ६ रूपयांनी कपात करण्याची घोषणा करत ही कर कपात आजपासून लागू केली. त्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरीकांना पेट्रोल ९.५० पैशाने तर डिझेल ७ रूपये स्वस्त दरात मिळणार …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्य उत्पादनात ३९ टक्के वाढ, शेत मालाला हमखास भाव पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी नको - भुसे

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म …

Read More »

राज्यपाल भेटले की म्हणतात, अजितजी… क्यूं फिकर करते हो १२ आमदारांच्या प्रश्नावर अजित पवारांनी दिली माहिती

महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांना पाठवून दिलेल्या घटनेस अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरी राज्यपालांनी अद्याप मंजूर केली नाही यावरून आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोनवेळा पत्रही पाठविले. तसेच याप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाकडून टीपण्णीही करण्यात आली. मात्र याप्रश्नावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी …

Read More »