Tag Archives: election commission of india

अतुल लोंढे यांची पत्राद्वारे मागणी, …आचार संहितेचे उल्लंघन केल्याने कारवाई करा

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम १६ मार्च रोजी जाहीर झाल्याने त्यादिवसापासूनच आदर्श आचासंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी धोरणे व प्रकल्प जाहीर करणे हे मतदारांवर प्रभाव टाकणारे असून त्यातून सत्ताधारी पक्षाला लाभ मिळू शकतो असे असताना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने रस्त्यांसाठी बोली लावली आहे. हे आदर्श आचार संहितेचे …

Read More »

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण …

Read More »

भारत निवडणूक आयोगाचे खर्चविषयक निवडणूक निरीक्षक दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाने खर्च विषयक बाबींसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात खर्चविषयक बाबींचा आणि निवडणूक विषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चविषयक बाबीसंदर्भात नागरिकांना संपर्क साधण्यासाठी या …

Read More »

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी तब्बल ११ दिवसांनी जाहिर केली. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करत मतदान प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम …

Read More »

काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मोठा दिलासा

लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मतदानाची सुविधा देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) जम्मू आणि उधमपूरमध्ये राहणाऱ्या खोऱ्यातील विस्थापित नागरिकांसाठी फॉर्म -एम भरण्याची किचकट प्रक्रिया रद्द केली आहे. याव्यतिरिक्त, जम्मू आणि उधमपूरच्या बाहेर राहणाऱ्या विस्थापितांसाठी (जे फॉर्म एम दाखल करणे सुरू ठेवतील), भारतीय निवडणूक आयोगाने फॉर्म -एम सोबत जोडलेल्या …

Read More »

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध …

Read More »

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने ४८ तासांच्या प्रचारापासून बंदी घातली होती. आयोगाने केसीआर यांना पक्षाविरोधात केलेल्या कथित “अपमानजनक” टिप्पण्यांबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीवर नोटीस बजावली. ६ एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, केसीआर यांनी पत्रकार …

Read More »

नागरिकांना संपर्क साधण्यासाठी निवडणूक निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करीता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने खर्च विषयक बाबींसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात खर्चविषयक बाबींचा आणि निवडणूक विषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चविषयक बाबीसंदर्भात नागरिकांना संपर्क …

Read More »

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी एनजीएसपी अर्थात नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आलेल्या कॉल्सना सकारात्मक प्रतिसाद यासाठी नियुक्त पथकाकडून देण्यात येत आहे. निवडणूक …

Read More »

Supreme Court चा बॅलट पेपरला नकार मात्र ईव्हीएम-व्हीव्हीपॅटसाठी दिले हे आदेश

देशात लोकसभा निवडणूका ७ टप्प्यात होत आहेत. आतापर्यंत देशात चार टप्प्यात किंवा फार तर दोन टप्प्यात निवडणूका पार पाडल्या जात होत्या. मात्र यंदा पहिल्यांदाज देशातील लोकसभा निवडणूका सात टप्प्यात पार पडत आहेत. यापार्श्वभूमीवर ईव्हीएम मशिन्सच्या वापराबाबत अॅड प्रशांत भूषण यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त करत ईव्हीएम मशिन्सऐवजी लोकसभा निवडणूकीत …

Read More »