मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहे. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे जेष्ठ आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी नाना पटोले यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला. काँग्रेस नेते नाना …
Read More »बांग्लादेशी नागरिकांची भाजपाकडून शोधाशोधा, पण त्यांच्याच आमदाराचा मतदारसंघ दिसेना आवाज उठविणाऱ्या कारकून दर्जाच्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांलाच गुंतविण्याचा वरिष्ठांकडून प्रयत्न
काही दिवसांपूर्वी मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातील ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविली. मात्र त्या मतदारसंघात बांग्लादेशी मुस्लिमांची संख्या वाढल्याने निकम यांचा पराभव झाला अशी आवई भाजपा नेत्यांनी उठविली. त्यानंतर भाजपाच्या मुंबईतल्या माजी खासदाराने अशा बांग्लादेशी नागरिकांची आणि त्यांच्या जन्म दाखल्याची शोध मोहिम हाती घेत मुंबईसह मालेगांव …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचाचा वापर वाढवणे काळाची गरज ‘मायक्रोसॉफ्ट’सारख्या कंपन्यांकडून कृत्रीम बुद्धीमत्ता कौशल्यवृद्धीत सहकार्य
शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका …
Read More »नागरिकांना मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांचे सरकार इतकं का घाबरतय ? एफआरएस तंत्रज्ञानाचा पहिला फटका मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना
राज्याचे आणि सरकार नामक यंत्रणेचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात सध्या जनतेच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाजपाप्रणित महायुतीचे सरकार स्थानापन्न झालेल्या सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर काम होत नसल्याने मंत्रालयाची वाट धरलेल्या नागरिकांना आता त्याच्या पासचे आणि चेहऱ्याचे फेसियल रिडींग द्यावे लागणार असल्याने राज्यातल्या नागरिकांना, पत्रकारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम 'सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करावे' – मुख्यमंत्री
सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे ( ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला …
Read More »प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, गतीमान करण्यासाठी सुधारित कार्यनियमावली राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता
प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतीमान करणारी सुधारित महाराष्ट्र शासन कार्यनियमावली प्रसिद्ध करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या सुधारणांमध्ये मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मुख्यमंत्री तसेच राज्यपाल यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती आदी बाबींसंदर्भात तरतुदीचा समावेश आहे. अशी पहिली …
Read More »महाराष्ट्राचा आदर्श देशातील इतर राज्यांमध्ये मात्र आता राज्यात गुजरात… गुजरातच्या मंत्रालयातील प्रशासनाच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या मंत्रालयातही बदल होणार
महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती इंग्रजांच्या काळात असलेल्या म्हैसूर प्रांतातून स्वतंत्र देशाच्या धोरणानुसार भाषावार प्रांत रचनेनुसार झाली. त्यामुळे महाराष्ट्राचा आणि गुजरातचा जन्म एकाच दिवशी न होता आधी गुजरातचा तर नंतर महाराष्ट्र निर्मितीचा दिवस साजरा करण्यात येतो. तसेच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात जे काही निर्णय़ आणि लोकोपोयोगी व प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली. …
Read More »१०० दिवसांच्या आराखड्याबाबत अधिकारीच गोंधळात तर मुख्यमंत्री म्हणतात ठोस कामगिरी करा लोककेंद्रित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा
साधारणतः मुंबईतील राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या राज्य सरकारचे विशेष अधिवेशन पार पडले या अधिवेशनात सरकार स्थापनेनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेच आठच दिवसात नागपूरात हिवाळी अधिवेशन पार पडले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाच्या प्रशासनात महत्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि १०० दिवसाचा कार्यक्रम जाहिर तयार …
Read More »मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे वाटपः मंत्री कोणत्या दालनात बसणार मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत आणि विस्तारीत कोणत्या इमारती हे मंत्री बसणार
राज्य मंत्रिमंडळातील बिन खात्याच्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाल्यानंतर वास्तविक पाहता राज्यातील जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मंत्री झालेल्या आमदारांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. मात्र या आमदारांना बसणार कोठे याची चिंता फारशी सतावत नव्हती. मात्र अखेर सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्र्यांना बसावयाच्या दालना संदर्भात शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयानुसार महसूल मंत्री …
Read More »मुंबई काँग्रेसची मंत्रालयावर तीव्र निदर्शने अमित शाह आणि भाजपाच्या गुंडगिरीचा धिक्कार
भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत, अमीत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत, जयभीमच्या नाऱ्यांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला होता. काल १९ डिसेंबरला भाजपाच्या सुमारे ४० गुंड कार्यकर्त्यांनी मुंबई कॉंग्रेस कार्यालयावर भीषण हल्ला केला. काठ्या, पेव्हर ब्लॉकने हल्ला करत …
Read More »
Marathi e-Batmya