Tag Archives: monsoon session

राहुल गांधी यांचा आरोप, निवडणूक आयोग घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी संसदेत बिहार मतदार यादी पुर्ननिरिक्षण प्रकरणी विरोधकांचा गोंधळ, सभागृहाचे कामकाज स्थगित

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान भारतीय निवडणूक आयोगावर (ECI) “फसवणूक” केल्याचा आरोप केल्यानंतर काही तासांनंतर, निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी गुरुवारी धीर धरण्याचे आवाहन केले आणि म्हटले की या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाट पाहावी. आरोपांना “निराधार” म्हणत निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणाले, “जर निवडणूक याचिका …

Read More »

उपराष्ट्रपती पदासाठी आयोगाने सुरु केली निवडणूकीची तयारी शक्य तितक्या लवकर वेळा पत्रकाची घोषणा करणार

संसदेच्या पावसाळी अधिवेशाला सुरुवात होताच झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काही विषय केंद्र सरकारला विश्वासात न घेता अधिवेशनाच्या कामकाज पत्रिकेवर घेतले. त्यामुळे भाजपा अंतर्गत झालेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना भाजपा नेत्यांनी थेट राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार जगदीप धनखड यांनी मुदत संपण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका करण्यासाठी काय केले? लोकसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केंद्राला केला सवाल

मुंबईची उपनगरीय रेल्वे ही लाईफलाईन आहे. परंतु दररोज होणारे अपघात आणि असुरक्षित प्रवासाने ती डेथलाईन बनली. लोकलने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे विभाग व सरकारकडे सातत्याने लोकल सेवेबद्दल तक्रार करूनही त्यात काही फरक पडलेला नाही. मुंबईतील लोकल सेवेसाठी सरकारने काय काय उपाययोजना केल्या, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष …

Read More »

आयकर विधेयकावरील संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत सादरः अधिकाऱ्यांना पूर्णाधिकार सोशल मिडीया आणि व्हॉट्सअॅप, ईमेल संबधित अधिकाऱ्यांना पाहण्याच्या तरतूदी कायम

सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन आयकर विधेयक २०२५ चा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या संसदीय निवड समितीने नवीन विधेयकातील तरतुदी कायम ठेवल्या आहेत ज्यामुळे कर अधिकाऱ्यांना आवश्यक असल्यास, ते ज्या लोकांवर शोध आणि जप्तीची कारवाई करत आहेत त्यांच्या सोशल मीडिया आणि खाजगी ईमेलमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्यास सक्षम केले जाईल. आयकर विधेयक २०२५ …

Read More »

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमीत मग्न, टीकेचा भडिमार नव्या वादाला माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा तोंड फोडले

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात विधानसभेचे कामकाज सुरु असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईल फोनवर ऑनलाइन रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा नव्या वादात सापडले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर …

Read More »

किरेन रिजिजू यांची माहिती न्या यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोगसाठी १०० खासदारांच्या सह्या ऑपरेशन सिंदूर प्रकरणी संसदेत चर्चा होणार

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी (२० जुलै, २०२५) सांगितले की, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या हकालपट्टीसाठी संसदेत प्रस्ताव आणण्यासाठी १०० हून अधिक खासदारांनी आधीच स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे लोकसभेत महाभियोग मांडण्यासाठी आवश्यक असलेल्या पाठिंब्याचा आकडा ओलांडला आहे.कि पुढे बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, सोमवार, २१ …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, महाराष्ट्र २० टक्के कमिशनचे राज्य झाले काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची अंतिम आठवडा प्रस्तावात सरकारवर टीका

पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले की ते ठोसे देतात. जेवण चांगले मिळाले नाही म्हणून मारहाण केली असेच गळकी एसटी बघून परिवहन मंत्र्यांचे काय करायचं? निकृष्ट बांधकाम करणाऱ्या मंत्र्यांचे, दवाखान्यात औषध नाही मिळाले की आरोग्य मंत्र्याला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस उत्तर देताना म्हणाले, मेट्रोसारखे डबे उपनगरीय रेल्वेला द्या गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल

महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना वेगाने चालना देण्यात येत आहे. राज्याच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून शहरी आणि ग्रामीण विकास अधिक गतिमान केला जात आहे. तसेच, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यात …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, महायुतीचे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पंचनामा

हे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, गल्लीत कितीही गोंधळ घातला तरी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सरकारला लगावला. जयंत पाटील पुढे म्हणाले की, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून आपण संबोधायचो. “पुणे तिथे काय उणे” …

Read More »

अनिल परब यांचा गंभीर आरोप, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्सबार मंत्र्याने तात्काळ राजीनामा द्या तर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मी त्यांचे आरोप ऐकले नाहीत

विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला. तसेच राज्यातील सर्व डान्सबार बंद असताना हा एकमेव बार कसा सुरु असा सवाल करत या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधान परिषदेत विचारले असता अनिल …

Read More »