Tag Archives: nagpur

राज्यात ४ वर्षात १४ खाणी सुरु होत १३ हजार जणांना मिळणार रोजगार आदासा येथे कोळसा खाणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते शुमारंभ

मुंबई: प्रतिनिधी आगामी ४ वर्षांत महाराष्ट्रात १४ खाणी सुरु होत आहेत आणि त्यातील ३ याच वर्षी सुरु करण्याचे आपण ठरविले आहे. या खाणींमुळे ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे १३ हजार लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती यावेळी वेस्टर्न कोलफिल्डने दिली. नागपूर जवळील आदसा येथील कोळसा खाणीचे मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

राज्यात ६० वाघांची नव्याने भर संख्या ३७२ वर पोहोचणार असल्याची वनमंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकूण ३१२ वाघ असून त्यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १६० वाघांचे अस्तित्व आहे. त्यातच येत्या वर्षभरात या परिसरात आणखी ६० नवीन वाघाच्या बछड्यांची भर पडणारआहे. त्यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील ५० वाघांना राज्यातील इतर जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. यासंदर्भात नुकतीच नागपूर येथे …

Read More »

कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीची सुरुवात या चार शहरातून होणार वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीला मान्यता द्यावी यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे मागणी करण्यात आली. या मागणीस आता केंद्र सरकारने आज मंजूरी दिल्याने या उपचार पध्दतीचा वापर लवकरच राज्यातील रूग्णालयातून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ट्वीटरवरून दिली. सुरुवातीला ही उपचार पध्दती वैद्यकीय …

Read More »

गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला, किराणा, औषधांच्या गाड्या सोडाव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एमएमआरमधील नागरीकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केलेली असली तरी यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली. तसेच शहरातील रस्त्यांवर गर्दी होवू नये यासाठी प्रत्येक सोसायटीत राहणाऱ्या नागरीकांच्या भाजीपाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. या भाजीपाल्याबरोबरच जर राज्य सरकारने प्रत्येक सोसायटीत, झोपडपट्टीभागात किराणा माल आणि …

Read More »

लॉकडाऊनमधील नागरीकांनो वाचा आणि अंमलबजावणी करा महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश, अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी कोविड १९ (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना आज मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली. या अधिसूचनेनुसार- अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठी राज्याच्या सर्व …

Read More »

लोकल, बस, बँका आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद शासकिय कार्यालयातील २५ टक्केवर सुरु राहणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना व्हायरसला थोपविण्यासाठी संपूर्ण जगावर लढण्याऐवजी थांबण्याची वेळ आली आहे. सततची वाढती गर्दी ओसरण्यास सुरुवात झालेली असली तरी ही गर्दी पूर्णपणे बंद होण्यासाठी मुंबईसह राज्यातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र मुंबईतील लोकल सेवा, बसेस आणि बँका वगळता गर्दी होण्यास कारण ठरणारी सर्व …

Read More »

दुपारी १ वाजेपर्यंत ३० तर ३ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात संथगतीने मतदान

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ पासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.१९ टक्के तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४६. १३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान …

Read More »

कर्जमाफीच्या प्रश्नावरून विधिमंडळात गदारोळ विरोधकांच्या गोंधळानंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित

नागपूर : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होते. सभागृहाचं सुरू होताच विरोधकांनी वेलमध्ये उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वाढत्या गदारोळामुळे सभागृह चालविणे अशक्य झाल्याने विधानसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. पुढेही असाच तर गदारोळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात …

Read More »

राज्य सरकारच्या विरोधात विरोधकांच्या हल्लाबोल मोर्चाला सुरुवात काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवाडे), सपा, माकप सहभागी

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक महत्वाच्या प्रश्नावर कॉंग्रस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षांच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चाची सुरुवात नागपूर येथील दिक्षाभूमीवरून सुरुवात झाली. या मोर्चामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह अनेक वरीष्ठ नेते सहभागी झाले होते. या मोर्चात शेकाप, आरपीआय (कवाडे) गट, समाजवादी …

Read More »