भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी वन नेशन वन इलेक्शन ‘एक राष्ट्र, एक मतदान’ योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळाने पीटीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले. मार्चमध्ये माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने टप्प्याटप्प्याने लोकसभा …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते महिलांसाठीच्या आणखी एक योजना जाहिर एलआयसीच्या योजनेचा शुमारंभ
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमा सखी योजनेचा शुभारंभ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आयुर्विमा महामंडळाने (LIC) महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली. ग्रामीण महिलांना विमा एजंट बनण्याची, उपजीविका करण्याची आणि ग्रामीण भागात विम्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एका वर्षाच्या आत १००,००० विमा सखींची नोंदणी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. एलआयसी …
Read More »मोदी-अदानी भाई-भाईः काँग्रेसची संसदेच्या आवारात निदर्शने प्रियांका गांधी यांनी आणली मोदी-अदानी भाई भाई लिहिलेली बॅग
गौतम अदानी आणि अदानी कंपनीवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानीच्या विरोधात चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत काँग्रेसने चौकशीची मागणी लावून धरली. तसेच यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदी-अदानी भाई भाऊ असे लिहिलेली एक बॅग यांनी आणली. त्यावेळी ही बॅग प्रियंका गांधी यांनी हातात घेत सर्वांना दाखविली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी …
Read More »मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने देवेंद्र फडणवीस यांचे ते स्पप्न अधुरेच राहणार? विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान केली होती घोषणा
राज्यात १५ वर्षात काही अंतराने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद भूषणविणारे भाजपाचे नेते तथा विद्यमान संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने देवेंद्र फडणवीस यांना आता महाराष्ट्रावरच लक्ष्य केंद्रीय करून रहावे लागणार असल्याने त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान विदर्भात केलेल्या घोषणेचे स्वप्न …
Read More »महायुतीचा शपथविधीः मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर अजित पवार, एकनाथ शिंदेंकडे उपमुख्यमंत्री राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ
महाराष्ट्रात महायुतीला संशयातीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपालांच्या वतीने राजशिष्टाचार विभागातील एका महिलेने शपथ दिली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. …
Read More »ऑक्सफर्ड विद्यापीठाचा अहवाल, मोदींच्या काळात प्रगती योजना आठ रखडलेले प्रकल्प कार्यान्वित झाले
ऑक्सफर्ड विद्यापीठाचा अलीकडील अभ्यास, “ग्रिडलॉकपासून वाढीकडे: नेतृत्व कसे सक्षम करते भारताच्या प्रगती इकोसिस्टम टू पॉवर प्रोग्रेस,” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रगती प्लॅटफॉर्मने भारतातील प्रकल्प अंमलबजावणीत कशी क्रांती आणली आहे यावर प्रकाश टाकला आहे. २०१५ मध्ये लाँच करण्यात आलेली, प्रगती, प्रो-ॲक्टिव्ह गव्हर्नन्स आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी लहान, नोकरशाहीच्या आव्हानांचे निराकरण करण्यात मदत केली …
Read More »जर्मनीच्या अँजेला मर्केल यांनी मनमोहन सिंग आणि मोदी यांच्यातील फरक सांगितला अँजेला मर्केल यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दोघांच्या व्यक्तीमत्वावर भाष्य
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘फ्रीडम: मेमोयर्स १९५१-२०२१’ या पुस्तकात जर्मनीच्या माजी चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी नमूद केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या त्यांच्या भेटींमध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की, “मोदींनी पदभार स्विकारल्यानंतर इतर धर्माच्या सदस्यांची संख्या वाढत आहे, प्रामुख्याने मुस्लिम आणि ख्रिश्चनांवर, हिंदु राष्ट्रवादीकडून हल्ले होत असल्याचा मुद्दा मोदींसोबत उपस्थित …
Read More »संजय राऊत यांचा खोचक सवाल, बावनकुळे राज्यपाल आहेत का, की राज्यपालांनी सांगितलय सत्ता स्थापनेचा दावा न करताच शपथविधीचा कार्यक्रम
राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती कडून अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला किंवा मुख्यमंत्री पदासाठी अधिकृत नावाची घोषणा केलेली नसतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची घोषणा काल संध्याकाळी केली. त्यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार तथा प्रवक्ते …
Read More »जयराम रमेश यांची जीडीपी घसरल्यावरून म्हणाले, तथाकथित न्यु इंडियाचे हेच वास्तव भाषणबाजी आणि वास्तविकता यांच्यातील दरी वाढविणारी
जुलै-सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर ५.४% पर्यंत घसरल्यानंतर शुक्रवारी, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, जे Q3FY२३ नंतरचे सर्वात कमी आहे. रमेश यांनी सरकारवर आर्थिक आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाषणबाजी आणि वास्तविकता यांच्यातील वाढणारी दरी ही आकडेवारी असल्याचा आरोप केला. …
Read More »महायुती सरकारचा आझाद मैदानावर शपथविधीः मुख्यमंत्री दोन दिवसात ५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
राज्यातील विधानसभा निवडणूकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतावर सर्वसामान्य नागरिकांसह सर्वच राजकिय पक्षांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच भाजपाकडून सत्तास्थापनेसाठी का पुढाकार घेत नाही असा सवाल करत संशयातीत बहुमतामुळेच भाजपाकडून सत्तास्थापनेत उशीर करत असल्याची चर्चाही राज्यात रंगत आहे. या पार्श्वभूमीवर …
Read More »
Marathi e-Batmya