बांग्लादेशने भारतातील ५० न्यायाधीश, न्यायिक अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी, आणखी किती अपमान होऊ देणार, कोणत्या तोंडाने तुम्ही स्वतःला जगाचा नेता म्हणता, ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाचे काय झाले? असा सवालही केला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना ऑगस्टमध्ये ढाका सोडून पळून जावे लागले होते. या नंतर त्या भारतात आल्या. त्यामुळे भारत आणि बांग्लादेशचे संबंध ताणले गेले आणि याचमुळे बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने रविवारी भारतातील ५० न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला. फेब्रुवारीमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण सत्र होणार होते.
प्रधानमंत्री मोदी, और कितनी बेइज्जती करवाओगे?
किस मुंह से आप अपने आप को विश्वगुरु बुलवाते हैं?
एक्ट ईस्ट' पालिसी का क्या हुआ? https://t.co/iZZnPghNyP
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 7, 2025
Marathi e-Batmya