Tag Archives: ncp

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राला आर्थिक मागास बनविण्यासाठीच प्रकल्प गुजरातला राज्यसरकारने तात्काळ हस्तक्षेप करुन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा;विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र राज्यासाठी महत्वपूर्ण असणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प तळेगाव एमआयडीसीत साकारण्यात येणार होता. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले होते, त्यादृष्टीने सर्व पुर्तता करण्यात आली होती. मात्र दोन लाख कोटींची गुंतवणुक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा महत्वपूर्ण प्रकल्प गुजरातमध्ये …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, पुन्हा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागतील का?...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. गुजरातची निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त असल्याचे दिसत असून महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, होय मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा हस्तक पैठण येथील सभेत विरोधकांबरोबर शिवसेनेवरही सोडले टीकास्त्र

औरंगाबादेतील पैठण येथील जाहिर सभेला गर्दी व्हावी म्हणून महिला व बाल विभाग विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकावरून आणि त्यातच सभेला येणाऱ्यांना प्रति माणशी २५० रूपये देण्याच्या एक ऑडिओ क्लिपमुळे वादात सापडलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आज झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे, शिवसेना आदी विरोधकांवर निशाणा …

Read More »

दिल्लीतील नाट्यावर अजित पवार म्हणाले,… त्यामुळे मी बोलणं टाळलं गर्दी जमवण्यासाठी ही वेळ मुख्यमंत्र्यांवर आली असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे...

पैठण येथील सभेला गर्दी जमवण्याकरीता अंगणवाडी सेविकांना, मदतनीस, पर्यवेक्षिकांना उपस्थित राहण्याचे पत्र काढावे लागते ही वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. पैठण येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेला येण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने अंगणवाडीसेविका, मदतनीस …

Read More »

अजित पवार यांनी दिला इशारा, …तर दुध उत्पादनाचा प्रश्न गंभीर पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी ;पशुधनाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये...

देशातील राजस्थान, पंजाब, हरयाणासारख्या राज्यानंतर महाराष्ट्रातील पशुधनालाही विषाणूजन्य लंपी त्वचारोगाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत राज्यातल्या १७ जिल्ह्यातल्या ५९ तालुक्यात हजारो जनावरे लंपी आजाराने ग्रस्त असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पशुधनांमधील लंपीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दुधउत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा. लंपीग्रस्त …

Read More »

शरद पवार म्हणाले, या मैदानावरून दिल्लीच्या तख्ताला आव्हान दिले… काही जण पदाची शपथ घेतात आणि पुन्हा अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण निर्माण करतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत सुरू असून या अधिवेशनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय नवीन भूमिका जाहिर करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले. तत्पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची फेरनियुक्ती कालच्या एका बैठकीत करण्यात आली, त्याची अधिकृत घोषणा देखील या अधिवेशनामध्ये होणार आहे. आज शरद पवारांनी आपल्या भाषणातून …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, आम्ही घाबरत नाही… सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा विडा फक्त शरद पवारच उचलू शकतात

देशात सध्या भितीचे वातावरण आहे आणि या देशातील भीतीच्या वातावरणाच्या विरोधात लढण्यासाठी लोक तयार आहेत आणि ते सर्वजण पवार साहेबांकडे आशेने पाहत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा विडा फक्त शरद पवारच उचलू शकतात असा विश्वास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्लीत व्यक्त केला. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

सरन्यायाधीश लळीत यांच्या सत्कारावरून जयंत पाटील यांनी टोचले मुख्यमंत्र्यांचे कान सरकार वैधतेची गंभीर सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीशांसोबत बसणे संकेतांना धरुन नाही

महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले यु.यु.लळीत हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याबद्दल सुरुवातीला राजभवनावर होणारा सत्कार सोहळा ऐनवेळी ताज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला. मात्र या सत्कार सोहळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि न्यायपालिकेच्या या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राच्या सुपुत्रांची नियुक्ती झाली. मात्र ते निवृत्त होण्यापूर्वी कोणाचा राज्य …

Read More »

शरद पवार म्हणाले, .. त्यामुळेच मोदी सरकारला कायदे मागे घ्यावे लागले रविवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन

देशात सर्वाधिक शेतकरी आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन बसतात, १ वर्षे आंदोलन करतात, ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांनीच याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चाही केली नाही. भारत सरकारने देशाच्या संसदेत तीन कायदे मंजूर केले, हे कायदे शेतकऱ्यांविषयी होते, शेतीविषयी होते. …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी विद्यार्थ्यासाठीचा ‘तो’ रद्द केलेला निर्णय पुन्हा लागू करा शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा फी योजना पूर्ववत सुरू करा

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज,विमाप्र व  इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा फी ही योजना बंद करण्यात येऊ नये अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली. छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, …

Read More »