Tag Archives: ncp

नाना पटोलेंच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले, फार महत्व देण्याचे कारण नाही काँग्रेस श्रेष्ठींकडे केली पटोलेंनी तक्रार

विदर्भातील भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीला डावलून भाजपाशी हात मिळवित सत्ता हस्तगत केली. याप्रकरणावरून राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसल्याचा आरोप करत त्यासंदर्भातील तक्रार काँग्रेस श्रेष्ठींकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यानंतर यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले …

Read More »

अजित पवार म्हणाले, पंतसंस्थांमधील ठेवींनाही ५ लाखांपर्यत लवकरच संरक्षण सहकारी आर्थिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील

सहकारी आर्थिक संस्था या चांगल्या चालल्या पाहिजेत, यासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी आरबीआयचे यापुर्वी ठेवीवर १ लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते ते आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढविले आहे. याच धर्तीवर राज्यात पतसंस्थांमधील ठेवीवर किती प्रमाणात विमा संरक्षण देता येईल याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार आहे. संस्था चालविणाऱ्या …

Read More »

फडणवीसांचे उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर, मास्टर नव्हे ती तर लाफ्टर सभा; तुम्ही कशात होते? होय मी अयोध्येला गेलो होतो तेव्हा मी नगरसेवक झालो होतो पण तुम्ही कुठल्या सहलीला गेलता

वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करत अयोध्येत काय सहलीला गेला होतात का? असा सवाल केला होता. त्यास आज भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, कालची सभा ही मास्टर सभा आहे म्हणून सांगण्यात येत होते. मात्र …

Read More »

संत तुकाराम महाराज देहू संस्थानची मागणी; केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा देहू रोड पोलिस ठाण्यात पत्र देत केली मागणी

संत तुकारामांच्या रचनेसारख्या पध्दतीचा वापर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत हिन भाषेत वैयक्तीक टीका करणारी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टवर शेअर केली. त्याच्यावरून कळव्यात काल गुन्हा दाखल होवून तिला अटक केल्यानंतर आज चितळेवर पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी मागणी संत तुकाराम …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या टोल्यावर अजित पवारांनी जोडले हात मला वाटेल तेव्हा त्याबद्दल सांगेन

जवळपास अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर जाहिर सभा घेतली. या सभेत पक्षप्रमुख ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापरावरून केंद्र सरकारला इशारा देत मनसे प्रमुख राज ठाकरेंवरही …

Read More »

चितळेवर कळव्यात गुन्हा दाखल झाल्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, इतकी विकृत असेल… स्त्रीत्वाचा फायदा घेत काहीही लिहू शकतो असे वाटत असेल तर ते चुकीचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल आणि त्यांच्या राजकिय व्यक्तीमत्वाबाबत अत्यत खालच्या पातळीवरील टीका करणारी कविता दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक प्रोफाईल शेअर कर स्वत:ची बौध्दीक दिवाळखोरी दाखवून देत नवा वाद ओढावून घेतला. तिच्या विरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड …

Read More »

शरद पवारांनी ऐकवलेली ‘पाथरवट’ कविता वाचली का? वाचण्यासाठी क्लिक करा विद्रोही कविता म्हणून त्याकाळी गाजलेली जवाहर राठोड यांची कविता खास वाचकांसाठी

मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात धर्माच्या नावावरील राजकारणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसिध्द कवी जवाहर राठोड यांची ‘पाथरवट’ ही कविता वाचून दाखवित धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना अप्रत्यक्ष चपराक लगावली. त्यातच हा कवितेवरून भाजपाकडून शरद पवारांचा तो व्हिडिओ शेअर करत …

Read More »

अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटलांचे म्हणणे खरे, पण पटोलेंचे ते विधान चुकीचे शेतकऱ्यांनो घाबरू नका...आणि टोकाचा निर्णय घेऊ नका... सरकार तुमच्या पाठीशी आहे

भाजपाचा तो केविलवाणा प्रयत्न आहे. पवारसाहेबांचे भाषण नीट ऐका. एका कवीचा दाखला त्यांनी दिला आहे. पण ते न दाखवता वेगळंच दाखवलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शरद पवार हे एकटे राष्ट्रवादी चालवतात असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे .बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे चालवत …

Read More »

शरद पवार म्हणाले, राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा, चुकलं तर अक्कलही शिकवतात डॉ.आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे देश एकसंध

देशातील विद्यमान राजकिय परिस्थितीबाबत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हणाले, आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा असून आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात आणि दुरुस्त करायला पुढे काही आलं तर त्याला संधी देतात असे सांगत देश एकसंध राहिला तो केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेमुळे असेही सांगितले. गुरुवारी १२ …

Read More »

ते पत्र जाहिर करत पटोले म्हणाले,… याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणायचे नाही तर काय ? माझ्यावर टीका करून सत्य झाकता येणार नाही

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवाल करून माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला आणि राज्याला माहित आहे. आम्ही जे काही करतो …

Read More »