Tag Archives: ncp

भाजपा हटाओ, बेटी बचाओ… बात नारी सम्मान की… कृती गुनाहगारोंको छोडने की राष्ट्रवादी महिला बिल्कीस बानो प्रकरणी आक्रमक ;मोदी सरकारचा जाहीर निषेध...

बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील अकरा दोषींना मोकाट सोडून महिलांवरील अत्याचाराचे उदात्तीकरण करणार्‍या गुजरातमधील भाजपा सरकारचा जाहीर निषेध… जाहीर निषेध… मै भी देश की बेटी हूँ, मुझे इन्साफ चाहिए… हमे माफ करो बिल्कीस बानो… मोदी के गुंडाराजमे औरतोंपर जुलम जबरदस्ती नही चलेगी… नही चलेगी… महिलाओं को दे सम्मान तो होगा …

Read More »

अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगात आली चक्कर; रूग्णालयात दाखल जे जे रूग्णालयात केले दाखल

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. अनिल देशमुख सध्या …

Read More »

भाजपाचा सवाल, उद्धव ठाकरे यांची ही नवी युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

एकाबाजूला शिवसेनेतून ४० आमदारांना घेऊन बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेतून अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी झाले. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे एकटे पडत असल्याचे दिसत असतानाच आज संभाजी ब्रिगेड या संघटनेने शिवसेनेशी युती करत असल्याचे उध्दव ठाकरे यांची …

Read More »

आता कॅगकडूनही महाविकास आघाडी सरकारच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक कोरोनाकाळात केलेल्या कामाचे आणि आर्थिक शिस्तीचे 'कॅग' अहवालात नोंद

कोरोना काळात सर्व कामकाज ठप्प असताना आणि राज्याच्या तिजोरीत एक छदाम पैशाचे इन्कम नसताना तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक दस्तुरखुद्द कॅगने केले. राज्यात सत्तांतर होवून नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या दृष्टीने मोठा सेटबॅक मानण्यात येत आहे. …

Read More »

अजित पवार यांचा आरोप, रेशनिंग व्यवस्थेतून गरीबांना बाहेर काढण्याचे षढयंत्र शासनाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून हे प्रकार थांबवावे

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांकडून सक्तीने आणि फसवून ‘सबसीडी’ सोडून देण्याचे अर्ज भरुन घेण्याचे काम अनेक रेशन दुकानातून सुरु आहे. त्यामुळे अनेक गरजू, गरीब लाभार्थी अंत्योदय योजनेपासून वंचित राहणार आहेत, त्यामुळे शासनाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करत हे प्रकार थांबविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले; असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री असणे कधीही चांगले… पोलिसांना १५ लाखात घर, ७५ हजार जागांसाठी भरती

विधानसभेत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी चर्चेत सहभाग घेत राज्यातील प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कंत्राटी मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती. तसेच फार मुख्यमंत्री राहणार नसल्याचे भाकितही विरोधकांकडून करण्यात आले. या टीकेचा धागा पकडत मुख्यमंत्री …

Read More »

उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, अजित दादा तुम्ही करेक्ट कार्यक्रम केलेला पण…. पहाटेच्या शपथविधीवरून काढला चिमटा

पावसाळी अधिवेशात विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर काल आणि आज चर्चा झाली. त्यानंतर या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून चांगलाच चिमटा काढत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या टोप्या उडविल्या. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर …

Read More »

अजित पवार यांची मागणी, कर्मचाऱ्यांप्रमाणे आदिवासी भगिनीं प्रसुतीसह बालसंगोपनासाठी रजा द्या आदिवासी बांधवांच्या कुपोषण, बालमृत्यूच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील

राज्यातील आदिवासी बांधवांच्या कुपोषणाचा प्रश्न अतिशय गंभीर असून आदिवासी विभागात बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आदिवासी समाजातील दारिद्र्य आणि शासकीय यंत्रणातील समन्वयाचा अभाव ही याची प्रमुख कारणे असून या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, अतिशय असंवेदनशीलतेने हा प्रश्न हाताळत असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर केली. आदिवासी विभागातील कुपोषण …

Read More »

विरोधकांचा सभात्याग; आदित्य ठाकरे म्हणाले, मंत्र्यांना लाज वाटायला पहिजे कुपोषणामुळे मृत्यू न झाल्याचे आदिवासी विकास मंत्र्यांचे उत्तर

कुपोषणामुळे राज्यात एकही मृत्यू झाला नाही, असे उत्तर आदिवासी विकास मंत्री विजय गावित यांनी दिल्याने विरोधक अधिवेशनच्या अखेरच्या दिवशी चांगलेच आक्रमक झाले. या प्रश्नी उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. राज्य सरकारने न्यायालयात बाजूही मांडलेली असून त्यात मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आलेली असताना विधासभेतील चर्चेत मात्र ते मृत्यू कुपोषणामुळे …

Read More »

जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, शिवाजी महाराज सुरतेला लुटायला गेले अन् तुम्ही…. पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधील नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाते हे भाजपच्या नेत्यांच्या लक्षात का येत नाही..

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लूटली… त्या सुरतेला तुम्ही शरण व्हायला गेलात… तुमची सुरतेवर स्वारी झाली परंतु त्याने महाराष्ट्राची बदनामीच झाली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधारी मंत्र्यांना, आमदारांना तर कधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना …

Read More »