Tag Archives: prakash ambedkar

अरविंद बन्सोड हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

पुणे: प्रतिनिधी अरविंद बनसोड याची हत्या झाली असून पोलिसांमार्फत ही आत्महत्या असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. नागपूर, थंडीपवनी येथे अरविंद बनसोड याची हत्या करण्यात आली होती. २७ मे रोजी …

Read More »

बहुजन आघाडीला झाली अखेर वंचितांची आठवण झोपडपट्यांमध्ये ? अन्नधान्याची मदत

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन महिने राज्यात लॉकडाऊन लागू असताना अनेक गरिब, गरजू, स्थलांतरीत कामगार, राज्यातील परजिल्ह्यातील कामगारांनावर खऱ्या अर्थाने वंचित म्हणून जगण्याची वेळ आली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्त्ये दिसत नव्हते. अखेर लॉकडाऊनचा ४ था टप्पा संपत आल्यानंतर अन्न धान्याची वाटप करण्याचे काम सुरु केले. धारावी पाठोपाठ …

Read More »

कोरोनाविरोधी लढ्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी घडवून आणली सर्वपक्षिय एकजूट विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची तत्काळ दखल

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करूत असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता ,आता मे अखेरपर्यंत आपणास ही …

Read More »

प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा …अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल

पुणे: प्रतिनिधी लॉक डाऊनला विरोध करण्यास आता सुरुवात झाली असून वांद्रे येथे जमलेली मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. लॉक डाऊन वाढविल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येईल असे त्यांना वाटू लागल्याने, त्यांनी आपला विरोध दर्शविला. शासनाकडे अन्नधान्याचा साठा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही म्हणून त्याचा उद्रेक वांद्रे …

Read More »

एनआयएने डॉ. तेलतुंबडे, नवलखा यांना घेतले ताब्यात कार्यालयात जावून स्वत: राहीले हजर

  मुंबई: प्रतिनिधी पुणे येथील एल्गार परिषद आयोजित केल्याप्रकरणी विचारवंत तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नात जावई डॉ. आनंद तेलतुंबडे आणि नवलखा यांना एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले. या दोन्ही विचारवंताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत आज संपत आल्याने त्यांनी अखेर शरणागती पत्करली. या गुन्ह्यात डॉ.तुलतुंबडे यांच्यावर माओवादी नक्षलवाद्याशी संबध असल्याचा आरोप …

Read More »

डॉ.आंबेडकर जयंतीसाठी जमा केलेला निधी हातावर पोट असणाऱ्यांना द्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी दलित, वंचित बहुजनांच्या अस्तित्वाचा लढा उभारणाऱ्या महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. तसेच हा जयंती उत्सव किमान दिड महिना तरी चालतो. त्यामुळे या जयंतीच्या निमित्ताने जमा केलेला निधी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच हातावर पोटावर असणाऱ्या कामगारांना द्या असे …

Read More »

सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर देवू शरद पवार, यशवंत सिन्हा, प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांचा निर्धार

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकार हुकुमशाही नीती वापरत आहे. जेएनयु (JNU) मध्ये जे काही झाले ते योग्य नव्हते. त्यामुळे संपुर्ण देशात विरोध होत आहे. सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसा तत्वाने उत्तर द्यायला हवे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महात्मा गांधी शांती यात्रेला हिरवा कंदील दाखवताना व्यक्त केले. …

Read More »

पवारांच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री करतायत आंबेडकरी जनतेशी जवळीक अजित पवारांकडून भीमा कोरेगांव, चैत्यभूमी, इंदू मिल स्मारकाला भेटी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकाराच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही शपथ घेताच आपल्या पदाचा भार स्विकारताच आंबेडकरी जनतेची अस्मितेच्या ठिकाणांना भेटी देत तेथील विकास कामांचा आढावा घेण्याचे काम सुरु केले. त्यामुळे याबाबत दस्तुरखुद्द शरद पवारांनीच याबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा आंबेडकरी …

Read More »

आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले, माझ्याकडची माहिती तुम्हाला देतो मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी भीमा कोरेगांव प्रकरणाची काही महत्वाची माहिती माझ्याकडे असून ती पुढील भेटीत आपणास देणार असल्याचे सांगत एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी २६ तारखेला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात परवा मोर्चा काढण्यात …

Read More »

सत्ता स्थापनेच्या चर्चेमागे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट वबआचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेच्या फेरीचे नाट्य घडवून आणले जात आहे. मात्र या चर्चेच्या मागे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. गेल्या महिनाभराच्या कालावधीत महाराष्ट्रातील जनता सरकार स्थापनेच नाट्य …

Read More »