Tag Archives: prakash ambedkar

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जाहीर काँग्रेसला १४४ जागा देण्याची अँड. प्रकाश आंबेडकरांची तयारी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या चार बड्या पक्षांकडून आघाडी-युतीची आणि जागा वाटपाची अद्याप चर्चाच सुरु आहे. मात्र तत्पूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आगामी विधानसभा निवडणूकीसाठीचा राजीनामा जाहीर करत पोलिसांची आठ तासाची ड्युटी करणार तर होमगार्डना पगारी कामगार म्हणून मान्यता देणार असल्याचे आश्वासन अँड.प्रकाश आंबेडकर यांनी दिले. बँलार्ड …

Read More »

वंचित बहुजन आघाडीने घेतले महापुरातील दुर्घटनाग्रस्त ‘ब्रह्मनाळ’ गाव ७०० कुटुंबाचे पुर्नवसन करणार अँड.प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी सांगलीत आलेल्या महापुरातून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावातील नागरीक बोटीने जात असताना झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. या ब्रम्हनाळ गावातील ७०० नागरीकांचे पुर्नवसन करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. मागील …

Read More »

भाजपाची बी-टीम आहे की नाही हे काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगावे वंचित आघाडी प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र आता त्यांच्याकडून आघाडीत समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यात येत आहेत. परंतु आम्ही भाजपची बी टीम आहोत का याचे स्पष्टीकरण सर्वात आधी कॉग्रेस-राष्ट्रवादीने करावे असा सवाल वंचित आघाडीचे प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. भारिप-बहुजन संघाच्या कार्यालयात आयोजित …

Read More »

मुख्यमंत्री म्हणतात, चव्हाणांसह काँग्रेसच्या आमदारांनो भाजपात या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोट

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांना भाजपात येण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना रोज सतत फोन करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. इतकंच नाही तर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्नही मुख्यमंत्री आणि भाजपातले इतर नेते करत असून राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही अशोक …

Read More »

वंचित आघाडीमुळे राज्यात युतीचीच आघाडी ४४ लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना तर औरंगाबादेत वंचित आघाडी पुढे

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यातील ४८ जागांपैकी जवळपास ४४ जागांवर वंचित आघाडीच्या मत विभागणी धोरणामुळे भाजप-शिवसेना युतीने आघाडी घेतली आहे. तर एकट्या औरंगाबादेत वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची हमी देणारी मावळ, शिरूर, अहमदनगर, …

Read More »

एक्झीट पोल काहीही म्हणोत आम्हीच सर्व जागा जिंकणार अँड.प्रकाश आंबेडकर यांचा विश्वास

अकोलाः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला उद्या मतमोजणी होत असून तत्पूर्वी जाहीर झालेले एक्झीट पोल काहीही म्हणोत वंचित आघाडी महाराष्ट्रात सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकू शकते असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी एक्झिट पोलवर भाष्य करणं टाळलं. ज्यांना एक्झिट पोल द्यायचे होते त्यांनी …

Read More »

वंचित आघाडी कोणाला वंचित करणार ? आघाडीबरोबरच युतीलाही घोर

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात चार टप्प्यात मतदान झाले. मात्र या चारही टप्प्यात वंचित आघाडीच्या झंझावाती प्रचारसभेला मिळालेला प्रतिसाद आणि जनमानसांचा कल झुकल्याने प्रस्थापित भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित करणार की वंचित स्थापित होणार यावरून जनमानसांबरोबरच राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीने आपले उमेदवार …

Read More »

वंचित आघाडीला मतदान करणाऱ्या दलित मतदारांवर हल्ले दलित कार्यकर्त्यांकडून जिल्हा पोलिस प्रशासनाकडे तक्रार

सोलापूरः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबतच भारीप बहुजन-महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची स्थापना करत निवडणूक लढविली. मात्र या प्रस्थापित राजकिय पक्षाला मतदान न करता वंचित आघाडीला मतदान का केले या कारणास्तव दलित-उपेक्षित कामगारांना जातीयवाद्यांनी त्रास आणि त्यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली. याबाबत सोलापूरातील सर्व दलित …

Read More »

तिहार जेलच्या इशाऱ्याने विरोधक सध्या सैरभर झाले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार जेलची भीत वाटत असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या घायळ झाली आहे. त्यामुळे त्यांनो नेमकं काय बोलाव हे कळतं नाही, म्हणून निवडणूकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस सैरभर झाल्याची टिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केली. आपण सगळया विरोधी पक्षांना एकत्र आणले …

Read More »

भाजपच्या मदतीसाठीच दाऊदची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतित्तुर

मुंबईः प्रतिनिधी भाजपला मदत करण्यासाठी वारंवार ही चर्चा समोर आणली जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाऊदला परत आणण्यास विरोध केल्याचे वक्तव्य केले. याचा समाचार नवाब मलिक यांनी घेतला. …

Read More »