Tag Archives: rss

हर्षवर्धन सपकाळ यांचा टीका, आता रेशिमबाग नाहीतर अदानी अंबानी चालवणार भाजपा काँग्रेसमुक्त वल्गणा करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून दुसऱ्या पक्षातील आयत्यावेळी आलेल्यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. भाजपामध्ये ही नाराजी राज्यभर सर्वदूर दिसत असून ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्तामुक्त भाजपा’ झाला आहे, असा घणाघाती …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन, बिहार निवडणुकीत भाजपा-जेडीयू (एनडीए)च्या विरोधात मतदान करा रशियाच्या तेलाचा फायदा सरकारला नाही, तर अंबानीच्या खासगी कंपनीला

आरएसएस-भाजपाला देशाचे संविधान बदलयाचे आहे. देशाला वाचवायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि पेरियार स्वामी यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आम्ही या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जेडीयू (एनडीए) युतीच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी …

Read More »

भरपावसात उद्धव ठाकरे यांची टीका, वाघाचं कातडं पाघंरणाऱ्या गाढवाची गोष्ट माहित आहे का ? अमित शाहचे जोडे त्यांनाच लखलाभ, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपावर टीका

शिवसेना उबाठाचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. परंतु संध्याकाळपासून अचानकच कधी पाऊस तर कधी ऊन असे निसर्गाचे चित्र पाह्यला मिळत. त्यातच पाऊस सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नेते मंचावर उपस्थित होते. या भरपावसातच उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात तमाम शिवसैनिकांना दसऱ्याच्या सुरुवात केली. उद्धव ठाकरे …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल,भारतातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला कोलिंबियाच्या ईआयए विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना केला हल्लाबोल

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते (LoP) राहुल गांधी यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आणि भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याचे प्रतिपादन केले. कोलंबियाच्या ईआयए EIA विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना, राहुल गांधी यांनी “रचनात्मक त्रुटी” या मुद्द्यावर प्रकाश टाकला आणि …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा उपरोधिक टोला, महात्मा गांधींना शरण जाणे हा आरएसएसचा वैचारिक पराभव संविधान सत्याग्रह पदयात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद, पदयात्रेचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम खडकीत

महात्मा गांधी यांनी समाजवाद, सामाजिक न्याय, सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली तर असत्य आणि हिंसा ही संघाची विचारधारा आहे. देशाच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार असल्याचा अपप्रचार संघ व संघ परिवाराने केला.परंतु द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडली हे सर्वांना माहित आहे, पण बदनामी मात्र महात्मा गांधींची करण्यात आली परंतु आज तोच संघ महात्मा गांधी यांना शरण …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा यांची टीका, हाहाकार माजला असला तरी केंद्राला अहवालही पाठवला नाही अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, दसरा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष हा सुवर्णयोग एकाच दिवशी आलेला आहे. रा. स्व. संघाला १०० वर्षे होत असताना आलेला हा योग संघाने समजून घ्यायला हवा. गांधी पुतळ्याच्या समोर फक्त मानवंदना देऊन चालणारा नाही तर नथुरामचा धिक्कार करून बुरसटलेले विचार, मनुस्मृती व बंच ऑफ थॉट …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, दसऱ्याला सीमोल्लंघन करत मोहन भागवतांनी आरएसएस बरखास्त करावा रामराज्याची भाषा करता तर अग्निपरिक्षेला का घाबरता?

आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षात देशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. जातीवाद व भांडवलशाहीचा विळखा आणखी घट्ट झाला आहे, ही मनुवादाची देण आहे. आता १०० वर्ष होत असताना पंचागानेही चांगला मुहूर्त दिला असून २ ऑक्टोबर रोजी दसरा, गांधी जयंती व रा. स्व. संघाची शंभरी असा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का? सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार

देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला विचार देण्याचे काम केले आहे. यापुढे असे रोजगार …

Read More »

अजित पवार यांचा धर्मनिरपेक्षतेचा नारा, तर खासदार सुनेत्रा पवार रा.स्व.संघाच्या कार्यक्रमाला हजेरी कंगणा राणौत यांनी दिली माहिती, प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांसमोर जोडले हात

साधारणतः काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने आमची विचारधारा फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा असून आम्ही धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावरून सातत्याने मांडली. परंतु त्यांच्याच पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असून त्यांनी चक्क राष्ट्रीय …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र आरएसएसच्या संकल्पनेला काँग्रेसचा विरोध आणि हर्षवर्धन सपकाळांचे भाकित खरे ठरले

हिंदी भाषा सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर लगेच याला विरोध करत हिंदी सक्ती करू नये अशी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. तसेच सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले होते. हा संस्कृती रक्षणाचा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे. आज राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात मोठे आंदोलन उभे राहिले …

Read More »