Tag Archives: social justice and special assistance dept.

संजय शिरसाट यांचा इशारा, विद्यार्थी वसतीगृहातील भोजनाच्या दर्जात तडजोड नाही जेवणाच्या चवीत किंवा गुणवत्तेत त्रुटी आढळून आल्या

राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार देण्यासाठी सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा व इतर सोयीसुविधांबाबत कोणतीही तडजोड राज्य शासन करणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले. सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहातील भोजन व इतर सोयीसुविधांबाबत सदस्य बाबासाहेब देशमुख …

Read More »

रोहित पवार यांचा आरोप, ५ हजार कोटी रूपयांची जमिन संजय शिरसाठ यांनी बिवलकरला दिली मराठा साम्राज्याविरोधात काम करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे पहिल्याच बैठकीत जमीन दिली जाते

मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटीशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे ४ हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटीशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती. नंतरच्या विविध कायदे, नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकारजमा झाली, परंतु वेगवेगळ्या प्रकारे गोलमाल करुन ही जमीन परत मिळवण्याचा बिवलकर कुटुंबाने सातत्याने प्रयत्न केला. त्यालाही त्या त्या टप्प्यावर नकार मिळाला, …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर तसेच आंबडवे परिसर विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पहिला व दुसरा टप्पा असे प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ घर व  आंबडवे परिसर विकसित करण्याबाबत आयोजित करण्यात …

Read More »

संजय शिरसाट यांची माहिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी २५ कोटींची तरतूद स्मारकाच्या जागेची पाहणी, १५ दिवसात जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने २५ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सामाजिक न्याय …

Read More »

१२ वर्षानंतर बार्टी संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण अर्थात बार्टी संस्थेत मागील १२ वर्षांपासून मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यानुसार ४६ टक्के वाढ करण्यात आली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहे. यावाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. मंत्री संजय शिरसाट म्हणाले, …

Read More »

सामाजिक न्याय विभागाच्या रिक्त पदाच्यासाठीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर ४ मार्चे ते १९ मार्च या कालावधीत ऑनलाईन परिक्षा होणार

सामाजिक न्याय विभागांतर्गत समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेचे ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कॉम्प्युटरबेस ऑनलाईन परीक्षा ४ मार्च २०२५ ते १९ मार्च २०२५ रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली …

Read More »

सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या महामंडळांना केंद्राचा ३०५ कोटींचा निधी मंजूर

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ३०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे . राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केंद्र शासनास या …

Read More »

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापना, कॉर्पस फंड आणि अडचणीत सापडलेल्या वेठबिगारांच्या मुक्तेतेसोबतच त्यांना तातडिची आर्थिक मदत देण्यात येत आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यातील एकूण १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली असून त्यातील १०४ वेठबिगार हे कातकरी …

Read More »

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी नवा निर्णय पाच वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत होता. मात्र ५० वर्षावरील ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून ज्यांचे वय …

Read More »

महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला कोणी महाव्यवस्थापक देता का ? २०१४ सालापासून महामंडळाला महाव्यवस्थापकच नाही

राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजामधील नवतरूण आणि नवउद्योजकांना भाग भांडवल उपलब्ध करून देता यावे किंवा त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात या उद्देशाने राज्य सरकारने महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र या आर्थिक विकास महामंडळाला मागील ९ वर्षापासून महाव्यवस्थापकच मिळेना झाला आहे. त्यामुळे महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला …

Read More »