मी रामकृष्ण हरीवाली, पण माळ घालत नाही कारण कधी कधी मटण खाते. खरं बोलते बाई मी काही त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही. मी मटण खाल्ल तर माझ्या पांडुंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही ?, आमचे आई-वडील खातात, नवरा खातो, सासू-सासरे खातात आणि आम्ही आमच्या पैशाने खातो बाबा, …
Read More »स्वातंत्र्य दिनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सवाल, आपण स्वतंत्र्य आहोत का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने …
Read More »सुप्रिया सुळे यांचा आरोप, सातत्याने क्राइम वाढतोय, लोकांना वर्दीची भिती नाही पुणे आणि बीडमधील परिस्थिती सारखीच
महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने क्राइम वाढतोय. त्यात पुणे जिल्हा आहे. जी पुण्यात परिस्थिती आहे, तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाहीय. वर्दीची भिती राहिलेली नाही. कोण आहे त्यांच्यामागे? सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत. याचा शोध घेण्याऐवजी राज्य सरकार मौन बाळगते असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …
Read More »सुप्रिया सुळे यांचा आरोप, लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा, १४ हजार पुरुषांना लाभ लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा
महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे? १४ हजारांहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती छाननीमध्ये समोर आली आहे. प्रस्तुत घोटाळ्यासाठी संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असून, या घोटाळ्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे …
Read More »कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमीत मग्न, टीकेचा भडिमार नव्या वादाला माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा तोंड फोडले
राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात विधानसभेचे कामकाज सुरु असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईल फोनवर ऑनलाइन रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा नव्या वादात सापडले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर …
Read More »गिरीश महाजन यांचे आंदोलनकर्त्या शिक्षकांना आश्वासन, वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात २०% वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा केले जाईल
पाच जुलै पासून आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना आज अखेर काही प्रमाणात दिलासा राज्य सरकारने दिला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी आज आझाद मैदानावर जात शिक्षकांच्या बँक खात्यावर वाढीव वेतन पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. शिक्षकांना पाच जुलै पासून वाढीव वेतन …
Read More »सुप्रिया सुळे यांचा इशारा, एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्य सरकारला इशारा
एसएससी बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून विद्यार्थ्यांवर अनेक गोष्टी लादल्या जाताहेत. इतर कुठलेही राज्य या गोष्टी करत नाहीये, महाराष्ट्र एवढी आग्रही भूमिका का घेतोय ? एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका असे इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिला. …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, महिलांसंदर्भात देशातील पहिलं धोरण हे महाराष्ट्रात तयार केलं महाराष्ट्र हुंडामुक्त व्हावा यासाठी प्रयत्न होणं गरजेचे-सुप्रिया सुळे
महिलांसंदर्भात देशातील पहिलं धोरण हे महाराष्ट्रात तयार केलं गेलं. सुदैवाने त्यावेळेला राज्याची सूत्रं माझ्याकडे होतं. पण निर्णय घेताना अनेक वेळेला कुठे ना कुठेतरी विरोध होत होता. मानसिकता बदलायची आवश्यकता होती. समाजातल्या पुरुष वर्गाची ती मानसिकता त्या काळात बदलली नव्हती. हल्ली सुद्धा तीच मानसिकता आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळते. असे राष्ट्रवादी …
Read More »सुप्रिया सुळे यांचा विश्वास, पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानेच वाढणार
यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल. ‘लडेंगे और जितेंगे’, असा विश्वास पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचा दौरा करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करत महात्मा गांधी, पंडित नेहरु, इंदिरा गांधी तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरच पुढे जाणार आहे असा …
Read More »सुप्रिया सुळे यांची स्पष्टोक्ती, मला आनंदच आहे पण तो त्यांचा प्रश्न महाराष्ट्रात आजही हुंडाबळी होतायेत हे एक समाज म्हणून आपलं अपयश
शरद पवार यांच्या नेतृत्वात सव्वीस वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना झाली, आणि हा २६ वर्षांचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने तसेच देशाने पाहिला आहे. त्यामुळे वर्धापन दिनाबद्दल वेगळं काही बोलण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. संघटना ही नेत्यांमुळे तर चालतेच, पण कार्यकर्ते हा सगळ्यात महत्वाचा घटक आणि त्यातला केंद्रबिंदू असतो. कारण तो रस्त्यावर …
Read More »
Marathi e-Batmya