मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्यावतीने आज मुख्यमंत्र्यांकडे पूरग्रस्त मदत निधीचा सुमारे ५० लाखाचा धनादेश देण्यात आला शिवाय पुरग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे याबाबतच्या २५ विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार …
Read More »तिहार जेलच्या इशाऱ्याने विरोधक सध्या सैरभर झाले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार जेलची भीत वाटत असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या घायळ झाली आहे. त्यामुळे त्यांनो नेमकं काय बोलाव हे कळतं नाही, म्हणून निवडणूकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस सैरभर झाल्याची टिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केली. आपण सगळया विरोधी पक्षांना एकत्र आणले …
Read More »युपीएचं सरकार आल्यावर २००९ सालासारखी कर्जमाफी देवू उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खा. सुप्रिया सुळेंचे आश्वासन
बारामतीः प्रतिनिधी आमचं युपीएचं सरकार आल्यावर २००९ मध्ये जशी कर्जमाफी केली तशी या देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिले. बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या सभेत …
Read More »उद्योग विभागाचे सचिव सतीश गवई यांना ७ कोटींची लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची नवाब मलिक यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याला ९० लाख खर्च होतात आणि ५ अधिकारी दौऱ्यावर जातात त्यावेळी ७ कोटी ६३ लाख रुपये खर्च होतात आणि हा खर्च एमआयडीसीच्या खात्यातून खर्च केला गेला. एकप्रकारे बिल्डरांच्या घशात जागा घालण्यासाठी हे सगळे केले जात असून राज्याच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव सतीश गवई यांना ७ कोटीची …
Read More »धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्याचा केंद्राकडे प्रस्तावच नाही फडणवीस सरकारने धनगर समाजाला फसविल्याचा खा.सुप्रिया सुळे यांचा आरोप
नवी दिल्ली : प्रतिनिधी राज्यातील धनगर समाजाला शेड्यूल्ड ट्राईब अर्थात एसटी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्यासंदर्भातला प्रस्तावच राज्य सरकारने पाठविला नसल्याची माहिती जनजातीय मंत्रालयाने लोकसभेत दिल्याने देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाची फसवणूकच केली असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. धनगर आरक्षणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित …
Read More »संविधानावर शरसंधान करेल त्याला उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जर कोण शरसंधान करणार असेल तर त्यांना उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. ही लढाई सोपी नाही परंतु ती लढल्याशिवाय गत्यंतर नाही आणि ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस लढल्याशिवाय थांबणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत दिला. राष्ट्रवादी …
Read More »राज्यात दोन्ही काँग्रेस आणि समविचारी पक्षांना घेवून निवडणूका लढणार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे स्पष्टोक्ती
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी चर्चा झाली असून महाराष्ट्रात एकत्र निवडणूका लढवायचा निर्णय झाल्याने जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही. मुंबईमध्ये एकत्र लढणार आहोत. त्यामुळे जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलताना दिली. या सभेला …
Read More »अखेर खा.सुप्रिया सुळेंच्या इच्छेने प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेतील अजित पवारांचे महत्व घटले
मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासह अन्य निवडीवरून पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादांवर अखेर खा. सुप्रिया सुळे यांच्या अंतिम इच्छेनुसार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांची निवड करत पडदा पडला. त्यामुळे संघटनांत्मक निवडीवर अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळेचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. पुणे येथे पक्षाच्या झालेल्या बैठकीला …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचा आता कोकणात हल्लाबोल आंबा, काजू शेतकऱी आणि मच्छिमारांच्या प्रश्नावर आंदोलन छेडणार
मुंबई : प्रतिनिधी विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्र याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाकर्त्या सरकारवर हल्लाबोल केला त्यानंतर चौथा टप्पा २ ते १२ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात झाला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात मिळाला. कोल्हापूरपासून सुरु झालेल्या हल्लाबोल आंदोलनातील शेवटची सभा पुण्याच्या वडगांवशेरी-खराडी येथे झाली. आता पुढील …
Read More »राज्यघटनेच्या बचावासाठी सर्व समविचारी पक्ष एकत्रितपणे लढा देवू शरद पवार, शरद यादव, अशोक चव्हाण, कॉ.सीताराम येचुरी, हार्दीक पटेल यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशात संसद असेल, न्यायव्यवस्था असेल यासह सर्वच ठिकाणी भाजपकडून मनमानेल त्या पध्दतीने कारभार सुरु आहे. त्यातच भाजपचाच एक मंत्री संविधान बदलण्याचा अजेंडा भाजपचा असल्याचे जाहीरपणे बोलत आहे. त्यामुळे पुरोगामी विचाराचे समविचारी पक्ष एकत्रित येवून संविधानाला वाचविण्यासाठी एकत्रित येवून आपला लढा देणार असल्याची ग्वाही भाजप आणि शिवसेना …
Read More »
Marathi e-Batmya