Tag Archives: uddhav thackeray

संजय राऊत म्हणाले, विरोधकांच्या फ्रंटसाठी राहुल गांधी य़ांनी पुढाकार घ्यावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबरील भेटीनंतर राऊतांची प्रतिक्रिया

मराठी ई-बातम्या टीम आम्ही हे अगोदरपासूनच म्हटलेलं आहे की, जर कोणता विरोधकांचा एक फ्रंट बनत असेल, तर काँग्रेसशिवाय तो शक्य नाही. राहुल गांधी लवकरच मुंबईत येणार आहेत, त्यांचा एक कार्यक्रम तयार होत आहे. मला वाटतं की जास्त बोलणं इथे योग्य नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, नंतर मी …

Read More »

केंद्रानंतर आता मविआही “ते” कायदे मागे घेण्याच्या तयारीत राज्य सराकरने स्थापन केलेली समिती घेणार निर्णय

मराठी ई-बातम्या टीम १४ महिने शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्यानंतर अखेर केंद्रातील मोदी सरकारने पारीत केलेले तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर त्या कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातही सुधारीत कायदे तयार करण्याची सुरु झालेली प्रक्रिया गुंडाळण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तसेच यासंदर्भातील अधिकृत घोषणा २२ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात करण्यात येणार असल्याची …

Read More »

कर्मचाऱ्यांची पगार वाढ मागे घेण्याचा प्रश्नच नाही…अन्यथा मेस्माखाली कारवाई परिवहन मंत्री अनिल परब यांचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

मराठी ई-बातम्या टीम काही जणांकडून एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली पगारवाढ ही फसवी आहे ती मागे घेतली जाणार अशा पध्दतीचे वृत्त पसरविले जात आहे. मात्र त्यात तथ्य नसून दिलेली पगारवाढ मागे घेण्याचा प्रश्नच नाही. मात्र संपकरी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही तर मात्र मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट …

Read More »

दहावी-बारावीच्या या विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क सरकारकडून माफ कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारचा निर्णय

मराठी ई-बातम्या टीम राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक अथवा कायदेशीर …

Read More »

२२ दिवसानंतर मुख्यमंत्री रूग्णालयातून घरी परतले आणखी दोन-तीन महिने घरी आराम करण्याच्या डॉक्टरांच्या सूचना

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानदुखीच्या आजारावरील उपचारासाठी मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात १० नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यानर १२ नोव्हेंबर रोजी स्पाईन सर्जरी करण्यात आली. त्यानंतर जवळपास १४ दिवसानंतर त्यांच्यावर फिजोओथेरपीचे उपचार सुरु करण्यात आल्याने आणखी काही दिवस रूग्णालयातील मुक्काम वाढला. मात्र आज अखेर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात …

Read More »

म्हाडा घेणार ठाण्यात ६५ एकर जमिन तर राज्य सरकार देणार कामगारांची देणी

मुंबई: विशेष प्रतिनिधी एकाबाजूला मुंबईत म्हाडाच्या मालकी हक्काच्या जमिनींचा साठा जवळपास संपुष्टात येत असल्याने परवडणारी घरे निर्माण करणे जिकरीचे बनत चालले आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने ठाणे येथील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या मफतलाल उद्योगासाठी दिलेली ६५ एकर जमिन परत घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून या जमिनीवर परवडणाऱ्या दरातील घरांच्या निर्मितीचा प्रकल्प …

Read More »

केंद्राने राज्याचे ३० हजार कोटी रुपये हडपले: आता महाराष्ट्रानेही दर कमी करावे कंगणाच्या बाष्कळ बडबडीला व्यासपीठ देऊन माध्यमांनी स्वातंत्र्यलढ्याच्या अवमानाच्या मोहिमेत सहभागी होऊ नये

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मागील सात वर्षांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढवून जनतेची लूट करत आहे. सतत दरवाढ करुन तिजोरी भरत असताना लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोलवर ५ रुपये व डिझेलवर १० रुपये …

Read More »

प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतोः महाराष्ट्रात “काय द्याचं” बोला राज्य भाजपाच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत आघाडी सरकारवर घणाघात

मुंबई: प्रतिनिधी आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली …

Read More »

मुंबई महापालिकेच्या निर्वाचित सदस्य संख्या वाढीसह मंत्रिमंडळाने घेतले हे ३ निर्णय महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार

मुंबई: प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या २३६ अशी होणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम ५ मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारी …

Read More »

समेटाऐवजी एसटी अध्यक्ष अनिल परबांकडून ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई कर्मचाऱ्यांचा संप चिघळला

मुंबई: प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांना मधाचे बोट दाखवून त्यांच्या अडचणीत भरच घालण्याचा प्रयत्न केला. त्यातच कोरोनामुळे या एसटी कर्मचाऱ्यांना नव्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने थेट राज्य सरकारच्या सेवेत समाविष्ट केल्याशिवाय पगारीचा प्रश्न सुटणार नसल्याची जाणीव झाल्याने याच मुख्य प्रश्नावरून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार …

Read More »