Editor

आमीर खान, नागराजच्या उपस्थितीत रंगणार ‘शिवाजी अंडरग्राऊंड’चा ७०० वा प्रयोग ! २१ मे रोजी यशवंतराव नाट्यगृह मध्ये होणार सादर

मुंबई : प्रतिनिधी शाहिरी जलशाच्या शैलीत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकानं महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या नाटकाचा गौरवशाली ७०० वा प्रयोग २१ मे रोजी मुंबईतल्या यशवंतराव  नाट्यगृह, माटुंगा येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या प्रयोगाला प्रसिद्ध अभिनेता आमीर खान, दिग्दर्शक …

Read More »

मुंबई बाजार समितीला राष्ट्रीय बाजार आवार म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरु आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील महत्वाची बाजारपेठ असून मुंबई बाजार समिती ही राष्ट्रीय बाजार आवार म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या बाजार समितीच्या आवारात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले. व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत आज पणनमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी आमदार …

Read More »

गृहनिर्माण, विमानतळ निर्मितीसाठी सिंगापूरमधील कंपन्यांशी करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे व्यापार मंत्री एस.ईश्वरन यांच्यात सामंज्यस करारावर सह्या

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गृहनिर्माणाच्या महत्त्वाकांक्षी उद्द‍िष्टांसह विविध क्षेत्रांत महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीचे प्रयत्न विकासाचे पर्व निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. महाराष्ट्र -सिंगापूर संयुक्त समितीची स्थापना व कार्यकक्षा निश्चितीबाबतच्या महत्त्वपुर्ण मसुद्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि सिंगापूरचे उद्योग व व्यापार मंत्री एस. ईश्वरन यांनी स्वाक्षरी केली. यावेळी पुणे …

Read More »

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचा आराखडा दोन महिन्यात येणार सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या चिरागनगर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा येत्या दोन महिन्यात प्राप्त होईल त्यांनंतर त्यासाठी लागणारा खर्च आणि पुढील कार्यवाही घोषित केली जाईल अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रालयात  दिली. अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे ही खूप वर्षांपासूनची मागणी आहे.  या …

Read More »

मिठागरांच्या जमिनी विकासकांच्या घशात घालाल तर सहन करणार नाही शिवसेनेच्या मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विरोध

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारमधील भाजप-शिवसेनेमधील दरी मोठ्या प्रमाणावर वाढत असून नाणार प्रकल्पानंतर आता मुंबईतील मिठागरांच्या जमिनींच्या अनुषंगाने शिवसेनेने विरोध दर्शविला असून  परवडणा-या घरांच्या नावाखाली मिठागरांच्या जमिनी विकासकांच्या घशात घालाल तर ते आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच मुख्यमंत्री …

Read More »

महसूल विभागाच्या विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांमुळे अतिक्रमणधारकांना मिळणार भरपाई राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या पात्र अतिक्रमण धारकांना नुकसान भरपाई देण्यास महसूल आणि नगरविकास विभागाने विरोध दर्शविला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे नाकारलेला प्रस्ताव पुन्हा संमत करत केंद्र व राज्य सरकारच्या जमिनीवरील पात्र अतिक्रमण धारकांना नुकसान भरपाई देण्याच्या निर्णयाला आज …

Read More »

मिशन शौर्य मधील आदिवासी विदयार्थ्याकडून एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील सोनेरी क्षण

मुबंई : प्रतिनिधी आकांक्षापुढे जिथे गगन ठेंगणे…या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात आज चार आदिवासी विदयार्थी यशस्वी ठरले आहेत. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणा-या माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे यशस्वी ठरले आहेत. एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपुर , जिल्हा प्रशासन चंद्रपुर आणि …

Read More »

राज्य सरकारी सेवेतील ३६ हजार रिक्त जागा भरणार ग्रामविकास, सार्वजनिक आणि गृह विभागातील सर्वाधिक जागांचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासह ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनातील ३६ हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा …

Read More »

पद्मश्री लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना दु:ख

सातारा-मुंबई : प्रतिनिधी मराठी तमाशा क्षेत्राला नवीन आयाम देणार्‍या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी वाई येथे खाजगी रुग्णालयात आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरविल्यामुळे त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार …

Read More »

२०२५ मध्ये देशाचे सकल उत्पन्न ५ ट्रिलियन डॉलर होणार सेवाविषयक जागतिक प्रदर्शनाचे राष्ट्रपतीं रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई  : प्रतिनिधी सेवा क्षेत्र आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयातून भारताचे सकल घरेलू उत्पन्न २०२५ मध्ये पाच ट्रिलियन डॉलर इतके होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करीत त्यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा तीन ट्रिलियन डॉलर इतका असेल. रोजगार, उत्पादकता आणि नाविन्यता या क्षेत्रात सेवांचे प्राबल्य आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे सेवा क्षेत्राचे योगदान शेती, उत्पादन क्षेत्र आणि …

Read More »