Editor

पूरग्रस्त ग्रामीण भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी पंतप्रधान आवास योजनेतून मदत पुररेषेच्या आतील निवासी अतिक्रमणांनाही मदत करणार असल्याची मंत्री मुंडे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरे दुरुस्त करुन देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत करण्यात येईल. पुररेषेच्या आतील नुकसान झालेल्या घरांनाही ग्रामविकास विभागाच्या निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करुन देण्याच्या योजनेंतर्गत इतरत्र घर बांधून देण्यासाठी मदत केली जाईल. ग्रामीण भागात नुकसान झालेल्या घरांचा इत्यंभूत आराखडा आठ …

Read More »

मोदी सरकारच्या कारभारामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात नाना पटोले यांचा आरोप ; आयुध निर्माणी मध्ये खाजगीकरणाला विरोध

मुंबईः प्रतिनिधी देशभरात खाजगीकरणाचा सपाटा लावलेल्या भाजप सरकारने आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत आयुध निर्माणी संस्थांमध्ये सुद्धा खाजगीकरणाचा डाव रचला आहे. या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे. मात्र हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी देशाची सुरक्षाच धोक्यात आणत असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जाहीर काँग्रेसला १४४ जागा देण्याची अँड. प्रकाश आंबेडकरांची तयारी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या चार बड्या पक्षांकडून आघाडी-युतीची आणि जागा वाटपाची अद्याप चर्चाच सुरु आहे. मात्र तत्पूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आगामी विधानसभा निवडणूकीसाठीचा राजीनामा जाहीर करत पोलिसांची आठ तासाची ड्युटी करणार तर होमगार्डना पगारी कामगार म्हणून मान्यता देणार असल्याचे आश्वासन अँड.प्रकाश आंबेडकर यांनी दिले. बँलार्ड …

Read More »

सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतेय राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला. देशभरात विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा मोदी सरकारचा प्रकार सुरु आहे. ईडी किंवा सीबीआय असेल याचा दुरुपयोग कसा करायचा हे …

Read More »

सरकारला कशाची मस्ती आलीय… कसली शेतकऱ्यांची टिंगल टवाळी लावलीय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

औरंगाबाद – बालानगरः प्रतिनिधी या सरकारला कशाची मस्ती आलीय, शेतकऱ्यांची कसली टिंगल टवाळी सुरु आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी बालानगर येथील जाहीर सभेत केला. पुरग्रस्त भागात भाजपचे मंत्री सेल्फी काढणाऱ्या भाजप मंत्र्याचा आणि सरकारचा भोंगळ कारभारावर अजितदादा पवार यांनी जोरदार आसूड ओढला. शिवस्वराज्य यात्रेच्या दुसर्‍या …

Read More »

मोदी, शाह आणि ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारल्यानेच राज ठाकरेंना नोटीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदी सरकारचा पर्दाफाश केला होता. तसेच विरोधी पक्षांना एकत्रीत करून ईव्हीएम विरोधात जनआंदोलन छेडले आहे. मोदी, शाह यांच्या हुकुमशाही विरोधात ठाम पणे उभे राहिल्यामुळेच राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारच्या …

Read More »

नोकरी लावण्याच्या नावाखाली गृह राज्यमंत्र्यांचा पीएस, आय़ुक्त, मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून लाखोंचा भ्रष्टाचार लोकायुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल

मुंबईः विशेष प्रतिनिधी मंत्रालयात नोकरीला लावतो किंवा शासकिय नोकरीत रूजू करण्याच्या नावाखाली राज्यातील तरूणांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. मात्र महानगरपालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या एका कनिष्ठ अभियंत्याला नियमित सेवेत समाविष्ट करण्याचे खोटे आश्वासन देत गतिमान कारभार आणि पारदर्शक कारभाराचा ढोल बजाविणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील …

Read More »

आयोजकांनो दहीहंडीच्या खर्चापेक्षा पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च करा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी दहीहंडी उत्सव साजरा न करता या उत्सवाला येणारा खर्च पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजकांना केले आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापुर, सातारा, कोकणामध्ये पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्यास काही काळ लागणार आहे. येथील पूरग्रस्तांना …

Read More »

सांस्कृतिक कार्य खात्यात “हौशे, नवशे, गवशे”ची परंपरा कायम..! पूर्ण वेळ "संचालक" शोधण्यास शासन हतबल

मुंबईः प्रतिनिधी एक महिना पूर्ण होत आला तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा कारभार हाकण्यासाठी पूर्ण वेळ ” संचालक” सांस्कृतिक कार्य खात्याला मिळनासा झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संचालनालयामध्ये “हौशे, नवशे, गवसे”ची परंपरा कायम राहणार असल्याचे दिसते. न. नि. पटेल हे सन २००० च्या दरम्यान संचालक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर अजय अंबेकर, आशुतोष …

Read More »

प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीच्या प्रवक्ते पदी डॉ.संजय लाखे-पाटील यांची नियुक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून नियुक्ती

मुंबईः प्रतिनिधी पक्षाला नवी उभी उभारी देण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे काम सुरु केले आहे. यानुसार राज्याच्या दुष्काळी आणि शेतकऱ्यांच्या समस्यावर काम करणारे डॉ. संजय लाखे-पाटील यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रचार समितीच्या सरचिटणीस आणि प्रवक्ते पदी नियुक्ती नुकतीच केली. डॉ.संजय लाखे-पाटील हे …

Read More »